भाषणं करून मुख्यमंत्री होत नाही, १४५ आमदारांचं संख्याबळ पाहिजे; अजित पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 11:42 AM2023-06-05T11:42:08+5:302023-06-05T12:41:51+5:30

झिरवळ यांच्या या वक्तव्याने आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

A Chief Minister cannot be made by making speeches, only 145 MLAs are needed Ajit Pawar spoke clearly | भाषणं करून मुख्यमंत्री होत नाही, १४५ आमदारांचं संख्याबळ पाहिजे; अजित पवार स्पष्टच बोलले

भाषणं करून मुख्यमंत्री होत नाही, १४५ आमदारांचं संख्याबळ पाहिजे; अजित पवार स्पष्टच बोलले

googlenewsNext

"अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, आपण खरच पवार यांना एकदा मुख्यमंत्री करु. आता अजितदादा मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असं मोठं वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं. काल नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. झिरवळ यांच्या या वक्तव्याने आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, अमुक एक मुख्यमंत्री झाला पहिजे असं वक्ते बोलले, पण फक्त भाषण करुन मुख्यमंत्री होतं नाही. त्यासाठी १४५ आमदारांच संख्याबळ पाहिजे. तसेच ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा लढणार असंही अजित पवार म्हणाले. 

ठाकरेंना धक्का! अखेर शिवसेना-भाजपा युतीची घोषणा; अमित शाह भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं महत्त्वपूर्ण ट्विट

गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. काल नाशिक येथील कार्यक्रमात आमदार नरहरी झिरवळ यांनीही मुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा केली. काल नाशिक येथे शेतकरी कृतज्ञ मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. झिरवळ म्हणाले, दादांना खरच आपण मुख्यमंत्री करु. आपल्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी निवडून दिले तर आपण नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकतो, असंही झिरवळ म्हणाले. 

यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील म्हणाले, नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. मी त्यावर वेगळं मत व्यक्त करण योग्य नाही. झिरवळ साहेब, काय अजिदादा काय किंवा मी काय आम्हा सगळ्यांना याची जाणीव आहे की संख्या आल्याशिवाय तिथंपर्यंत पोहोचता येणार नाही. आम्हाला येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. परफॉमन्स दाखवल्यानंतर शरद पवार जो निर्णय घेतील त्याची अंबलबजाणी होईल, आणि यात आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असंही जयंत पाटील म्हणाले. 

Web Title: A Chief Minister cannot be made by making speeches, only 145 MLAs are needed Ajit Pawar spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.