Join us  

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेला मिळाली नोटीस, तब्बल १५ वर्षांनंतर शो बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 3:25 PM

मालिकेला नोटीस मिळाली असून १५ वर्षांनंतर अखेर यावर पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

'स्टार प्लस'वरील 'ये रिश्ता क्या कहलाता' (Yeh Rishta Kya Kehlata Hain) मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेचा वेगळा चाहतावर्ग आहे. अक्षरा-नैतिक च्या भूमिकेत दिसलेले हिना खान आणि करण मेहरा यांनी पहिल्यांदा मालिकेत काम केलं. नंतर शिवांगी जोशी-मोहसीन खान यांच्यामुळे मालिका चालली. तर आता आणखी नवी स्टारकास्ट सध्या मालिकेत दिसत आहे. मात्र आता या शोला नोटीस मिळाली असून १५ वर्षांनंतर अखेर मालिकेवर पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

टेलिव्हिजन निर्माते राजन शाही (Rajan Shahi) यांनी नुकतीच 'टेलीचक्कर'ला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले,"चॅनलकडून आम्हाला मालिका बंद करण्याची नोटीस मिळाली आहे. प्रोग्रॅमिंग टीमकडून ही नोटीस आली आहे. पण जसं नेहमी होतं तसं काहीतरी आश्चर्यकारकच घडेल. याआधीही नोटीस आल्या आहेत पण जेव्हा नोटीस येते तेव्हा टीआरपी आणखी वाढतो असं आम्ही गंमतीत म्हणतो. प्रेक्षक मालिका बंद होऊ देत नाहीत."

राजन शाही यांच्यासाठी 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका म्हणजे बाळासारखीच आहे. यासोबत त्यांचं खास नातं आहे. या प्रवासात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. मधल्या काळात शोचा टीआरपी खूपच घसरला. मात्र तरी सध्या मालिका जोरात सुरु आहे. मालिकेत चौथी पिढी दाखवण्यात आली आहे. समृद्धी शुक्ला, रोहित पुरोहित, अनिता राज, सलोनी संधू, शिवम खजुरिया, श्रुती रावत, गौरव शर्मा सह अनेक कलाकार आहेत.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैटेलिव्हिजनस्टार प्लस