Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बघतोस काय मुजरा कर’ टीमची ‘लोकमत’ आॅफिसला भेट!

By admin | Updated: February 3, 2017 02:56 IST

‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगत आहे. शिवाजीमहाराजांना या चित्रपटाच्या माध्यमातून वंदन करण्यात आले आहे.

‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगत आहे. शिवाजीमहाराजांना या चित्रपटाच्या माध्यमातून वंदन करण्यात आले आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने पुण्यातील लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे, क्षितीज पटवर्धन, आदर्श शिंदे आणि संगीतकार अमितराज उपस्थित होते. या चित्रपटाकडे राजकारण म्हणून पाहिले जाईल किंवा चित्रपटाला काही अडचणी येतील असे वाटतेय का? या प्रश्नावर जितेंद्र सांगतो, ‘नाही मला असे बिल्कूल वाटत नाही. कारण आम्हाला सत्ताधारी पक्षातीलच अनेकांनी असे सांगितले आहे की, ‘गड-किल्ल्यांचे संवर्धन हे झालेच पाहिजे आणि या चित्रपटाच्या ट्रेलरचा परिणाम आहे की नाही हे मला माहीत नाही. पण, औरंगाबादमधील तीन किल्ल्यांना ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक हे नक्कीच घडतेय असे मला वाटते.’ अनिकेत विश्वासराव सांगतो की, ‘आम्ही जेव्हा चित्रपटाच्या ट्रेलरचे लाँचिंग सिंहगडावर केले तेव्हा तिथे गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणारे महाराष्ट्रातील अनेक गु्रप आले होते. ते आम्हाला पहिल्यांदाच तिथे भेटले. आता हे सर्व गु्रप सदस्य एकमेकांच्या संपर्कात राहून अजून चांगले काम करू शकतील यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता?’ पर्ण सांगतेय, ‘सिनेमाचा विषयच आत्ताच्या काळात महत्त्वाचा आहे. सध्या शिवाजीमहाराजांचे विचार सोडून बाकी सर्व काही समाजात घेतले जात आहे. तो विचार समाजात पोहोचावा हा सिनेमाचा प्रयत्न आहे. अक्षय आणि माझी ट्यूनिंग अतिशय उत्तम आहे. आम्ही तीनही मुली यांना कशाप्रकारे चित्रपटात साथ देतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील महापुरुषांचे विचार जर कलाकार म्हणून पोहोचवता येत असेल तर यासारखी आनंदाची गोष्ट नाही.’