Join us  

मन उडू उडू झालं: दिपू सोडणार देशपांडे सरांचं घर? सत्तूच्या घरात फुलणार इंद्रासोबत संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 10:50 AM

Man udu udu zal: या कठीण काळात सत्तू दोघांची मदत करणार असून त्याचं घर तो या दोघांसाठी खुलं करणार आहे. त्यामुळे या घरात राजाराणीचा नवा संसार फुलणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' (man udu udu zal) ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. इंद्राचं सत्य देशपांडे सरांसमोर आल्यामुळे त्यांनी इंद्रा आणि दिपूच्या लग्नाला नकार दिला आहे. इतकंच नाही तर यापुढे इंद्राला भेटायचं नाही अशी ताकीदही दिपूला दिली आहे. देशपांडे सरांनी घेतलेल्या या निर्णयामुळे इंद्राची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे त्याची ही अवस्था पाहावत नसल्यामुळे दिपू देशपांडे सरांचं घर सोडून नवा संसार थाटणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा आणि दिपू नव्याने त्यांचा संसार थाटणार आहेत. विशेष म्हणजे या कठीण काळात सत्तू दोघांची मदत करणार असून त्याचं घर तो या दोघांसाठी खुलं करणार आहे. त्यामुळे या घरात राजाराणीचा नवा संसार फुलणार आहे.

व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये दिपू इंद्रासोबत संसार थाटायला सुरुवात करते. परंतु, घराची अडचण असल्यामुळे सत्तू त्याचं घर या दोघांना देऊ करतो. त्या हे तिघं घराची साफसफाई करुन नवा संसार थाटतात. परंतु, दिपूच्या या निर्णयावर देशपांडे सरांची काय प्रतिक्रिया असेल?  सरांचा रोष पत्करुन दिपू खरंच इंद्राची साथ देईल का? देशपांडे सर या दोघांचा स्वीकार करतील का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारऋता दूर्गुळेअरुण नलावडे