वीरपूरची रानी मर्दानीच्या शौर्याची कथा सांगणारी 'ना आना इस देश में लाडो' सिझन 2
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 15:29 IST
देवी म्हणून पूजल्या जात असलेल्या, दुर्बळ जात असल्यामुळे दडपल्या गेलेल्या विरोधाभासाने भरलेल्या देशात, महिलांना समाजातील त्यांचे हक्काचे स्थान शोधण्यासाठी ...
वीरपूरची रानी मर्दानीच्या शौर्याची कथा सांगणारी 'ना आना इस देश में लाडो' सिझन 2
देवी म्हणून पूजल्या जात असलेल्या, दुर्बळ जात असल्यामुळे दडपल्या गेलेल्या विरोधाभासाने भरलेल्या देशात, महिलांना समाजातील त्यांचे हक्काचे स्थान शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो.लिंग समानता या समस्येचा महिलांना पुरातन काळापासून सामना करावा लागत आलेला आहे. शक्तिमान आणि कणखर महिलेची कथा जिवंत करण्यासाठी, 'ना आना इस देश में लाडो' या प्रसिद्ध व नाटकिय अनुकरण असलेल्या शोचा दुसरा सीझन लाडो-वीरपूर की मर्दानी मधून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. धवल गाडा प्रॉडक्शन द्वारे निर्मित केलेला लाडो-वीरपूर की मर्दानी या शो मध्ये पहिले प्रकरण संपल्यानंतर, काही वर्षांनंतरचा अम्माजीचा ती जे ठिकाण स्वतःचे मानत होती त्याच्या पासून दूर तिच्या नातींना वाढवण्याचा प्रवास दाखविला आहे.या लक्षवेधक कथेतून पुनरागमन करत असलेल्या मेघना मलिक तिची भूमिका पुन्हा करत आहे एक भीतिदायक अम्माजी म्हणून, त्याच धाडसीपणाने आणि तीव्रतेने जसे तिने पहिल्या सीझन मध्ये साकारले होते.या शोमध्ये अविका गौर प्रमुख पात्र अनुष्काच्या भूमिकेत दिसणार आहे-जिचा कायद्याच्या विणीवर पूर्ण विश्वास आहे, या निवेदनामध्ये तिच्या सोबत आहे पलक जैन तिची बहीण जान्हवी म्हणून. शोच्या प्रारंभा विषयी बोलताना, कलर्सच्या कंटेंट प्रमुख मनीषा शर्मा, म्हणाल्या “ना आना इस देश में लाडो, ही त्या काळातील अतिशय सशक्त व्यक्तिरेखेवर आधारीत कथा होती आणि ती कलर्सवर अतिशय चांगली चालली होती. आमच्या नेटवर्क वरील सामाजिक विषयाशी संबंधित शो आणि सशक्त व्यक्तिरेखांवर आधारीत शोंचे जसे की शक्ति एक एहसास की आणि उडान यश पाहिल्यानंतर, आम्ही लाडो एका रोमांचक कलाटणीसह पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला. आशा आहे की अविका गौर आणि अम्माजी (मेघना मलिक) या दोन प्रभावशाली चेहेÚयांनी स्क्रीनवर लहरी निर्माण केलेल्या पाहणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”तेच पुढे सांगताना, निर्माते धवल जयंतिलाल गाडा म्हणाले, “लाडोच्या या आवृत्तीच्या संकल्पनेच्या विकास करण्यात आम्हाला काही वेळ लागला आहे. मेघना मलिक यांचे शक्तिशाली अम्माजीच्या रुपातील पुनरागमन आणि भारतीय टेलिव्हिजनवरील लाडका चेहेरा असलेल्या अविका गौरचे शो मध्ये काम करण्यामुळे या शोविषयीचा आमचा दृष्टिकोन पूर्ण झाला आहे. नामवंत कलाकारांनी त्यांच्या बरोबर उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्यामुळे लाडो वीरपूर की मर्दानी हा भारतातील सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे.” अम्माजींची अतिशय क्लिष्ट व्यक्तिरेखा साकारणा-या मेघना मलिक म्हणाल्या, “लाडोच्या या आवृत्तीतील अम्माजी मनाने, शरीराने आणि दिसण्यात सुद्धा अगदी वेगळया आहेत. गैरसमजूतीचा बळी असलेल्या तिला आधी मुलगी जन्माला आलेली नको होती. पण, काळ बदलला आहे, आणि आता ती महिलांचा कैवार घेणारी बनली आहे आणि महिलांचा गौरव, सुरक्षा आणि हक्कां विषयीच्या संवेदनशील समस्यांचा उल्लेख करत आहे.”अनुष्काची भूमिका करणारी अविका गौर म्हणाली, “या शोला त्याचा वारसा चिकटलेला आहे आणि या दुसÚया प्रकरणात महिला हक्कांवरील समस्या दिसून येणार आहेत. आजच्या काळाशी आणि दिवसांशी सुसंबंद्ध असणाÚया या शो मध्ये काम करण्यासाठी माझी निवड झाल्या बद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. कलर्स मला अगदी घरच्या सारखा आहे आणि आम्ही एकत्रित येऊन बालिका वधू आणि ससुराल सिमर का हे प्रसिद्ध शो प्रेक्षकांना सादर केले आहेत. माझी व्यक्तिरेखा असलेली अनुष्का ही शूर आणि स्वतंत्र बाण्याची आजच्या काळातील तरुण मुलगी असून ती जे योग्य आहे त्यासाठी काहीही झाले तरी लढणारी आहे, आणि मला वाटते की हे असे काही आहे जे प्रेक्षकांच्या मनाला खोलवर भिडेल.” आधुनिक काळातील ही कथा सुरू होते दिल्ली मध्ये, जेथे अम्माजी निवृत्त आरामदायी जीवन त्यांच्या लाडक्या दोन नातीं सोबत जगत आहेत, त्यांनी त्यांच्या मागील काळातील अस्थिर जीवनाचा त्याग केला आहे. तथापि, नशीबाचा फेरा त्यांना वीरपूरला (हरियाणा मधील) घेऊन जातो, जे आता अपकिर्ती, रक्त आणि हिंसेने भरलेले, वाईट गाव झाले आहे. या शो मध्ये बलवंत सिंग चैधरी (रितुराज सिंग), रणबीर (अंकित राज), कोमल (झलक देसाई), तेज सिंग चैधरी (हिमान चैधरी) आणि सुनेहरी (सुदिप्ती परमार) हे आणि असेच अनेक नामवंत कलाकार प्रमुख भूमिका करताना दिसणार आहेत.