Join us  

‘Anupama’ मालिका बंद होणार? सोशल मीडिया ट्रोलिंगवर मेकर्सनं दिली रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:39 AM

Anupama makers on #StopRuiningAnupama Trend: ट्रोलिंग? ‘अनुपमा’च्या मेकर्सला ‘नो टेन्शन’, उलट साजरा केला आनंद!!

Anupama makers on #StopRuiningAnupama Trend: ‘अनुपमा’ (Anupama) ही टीव्हीवरची सर्वाधिक लोकप्रिय हिंदी मालिका. मालिकेत सध्या अनुज व अनुपमाच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. संगीत सेरेमनी झाली. अनुपमाच्या हातावर अनुजच्या नावाची मेहंदी रंगली. अर्थात ही मेहंदी चाहत्यांना अजिबात आवडली नव्हती. यावरून ‘अनुपमा’ ही मालिका सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. मेहंदी व संगीत सेरेमनीत मेकर्सनी ज्याप्रकारे ट्विस्ट आणला, तो सुद्धा प्रेक्षकांना आवडला नव्हता. यानंतर #StopRuiningAnupama असा हॅशटॅगही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी मालिका बंद करण्याचीही मागणी केली होती. आता या ट्रोलिंगवर अनुपमाच्या मेकर्सनं प्रतिक्रिया दिली आहे. 

होय, सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगवर ‘अनुपमा’च्या मेकर्सनी चुप्पी तोडली आहे. होय, ट्रोलिंगमुळे ‘अनुपमा’च्या कथेत काहीही बदल होणार नाही, कुठलाही ट्रॅक बदलणार नाही, असं मेकर्सनी अगदी छातीठोकपणे सांगितलं आहे.  

बॉलिवूड लाईफने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. चॅनलशी संबंधित एका सूत्राने सांगितल्यानुसार, मेकर्स सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. ट्रोलिंगला घाबरण्याची गरज नाही, असं मेकर्सचं मत आहे. मेकर्स मालिकेत एक मध्यवर्गीय लग्न दाखवू इच्छित होते. कारण अनुज व अनुपमा फार काही श्रीमंत नाहीत. त्यामुळे दोघांच्याही लग्नात फार तामझाम दाखवला गेला नाही. सोशल मीडियावर अनुपमा ट्रेंड होतेय, हे पाहून मेकर्स खूश आाहेत. आपला प्लान यशस्वी झाला, याचा त्यांना आनंद आहे. प्रत्येक लग्नात मेहंदी ग्रॅण्ड नसते. आम्हाला हेच दाखवायचं होतं. आम्ही फक्त लग्नाच्या डिटेलिंगवर लक्ष दिलं आणि ते प्रेक्षकांपर्यंत नेमकं पोहोचलं, असं मेकर्सचं म्हणणं आहे.

अनुपमा स्वत:ला दोष देणार...अनुपमा व अनुजच्या संगीत सेरेमनीत बापूजींना हार्ट अटॅक येतो. ते जमिनीवर कोसळतात. संगीत सेरेमनी थांबवून बापूजीना रूग्णालयात हलवण्यात येतं आणि वनराजचा सगळा राग अनुपमावर निघतो. बापूजीच्या या अवस्थेला तू जबाबदार आहेस, असं म्हणून तो अनुपमाला नको ते बोलतो. डॉक्टर बापूजीला सर्जरी करण्याचा सल्ला देतात. पण लग्न झाल्याशिवाय मी सर्जरी करणार नाही, असं बापूजी म्हणतात. अनुपमा त्यांना सर्जरीसाठी तयार करण्याचे प्रयत्न करते. पण मी लग्नाआधी काहीही रिस्क घेणार नाही, असं बापूजी म्हणतात.

अनुपमा हे ऐकून नाराज होते. तुम्ही सर्जरी करणार नसाल तर मी अनुजसोबतचं लग्न मोडते, असं ती म्हणते. बापूजीची तब्येत आणि वनराजचा संताप बघून अनुपमा स्वत:ला दोषी मानते. अनुज तिला सावरतो. यादरम्यान वनराज व अनुज पुन्हा आमनेसामने येतात. वनराज अनुपमा व अनुजला घराबाहेर जाण्यास सांगतो. आता अशात अनुज व अनुपमाचं लग्न कुठे होतं, कसं होतं, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारस्टार प्लस