Join us

भगवान कालभैरवची प्रार्थना करून राहुल शर्माने साजरा केला आपला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 11:57 IST

भगवान कालभैरवची प्रार्थना करून राहुल शर्माने साजरा केला आपला वाढदिवस. असं म्हणतात की श्रद्धेमध्ये पर्वतही हलवण्याची शक्ती असते आणि ...

भगवान कालभैरवची प्रार्थना करून राहुल शर्माने साजरा केला आपला वाढदिवस. असं म्हणतात की श्रद्धेमध्ये पर्वतही हलवण्याची शक्ती असते आणि ही युक्ती राहुल शर्मासाठी अगदी सार्थ आहे.स्टार भारतवरील नवीन मालिका 'काल भैरव रहस्य'मध्ये राहुल नायकाची भूमिका साकारत आहे. ह्या अभिनेत्याने हल्लीच आपल्या व्यस्त चित्रीकरणामधून आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी घेतली.त्याने त्याच्या आयुष्यातील ह्या खास दिवशी भगवान काल भैरवची प्रार्थना केली. ह्या अभिनेत्याच्या घरचे सदस्य आणि जवळचे मित्र त्याच्या घरी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते.राहुल शर्मा म्हणाला, “माझ्या वाढदिवशी मी भगवान काल भैरव यांची माझ्या घरी प्रार्थना केली.माझा पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आशिर्वादामुळेच मला ह्या शो चा हिस्सा बनण्याची संधी मिळाली. माझ्या मित्रांनी आणि कुटुंबाती सदस्यांनी माझ्यासाठी रात्री सरप्राईज प्लॅन केले होते.माझे खास मित्र माझ्या  वाढदिवसासाठी आले याबद्दल मी खूप खुश आहे.”आजवर कधी न सादर झालेली रहस्यमय कथा‘काळभैरव रहस्य’ या सनसनाटी मालिकेतून सिध्दपूर या काल्पनिक गावातील एका पुरातन मंदिराभोवती असलेल्या रहस्याची कथा उत्कंठावर्धक पध्दतीने प्रेक्षकांपुढे सादर होत असून तिला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या मालिकेच्या कलाकारांनी अलीकडेच इंदूरपासून सुमारे 20 किमी अंतरावरील महेश्वर येथे 20 दिवस मालिकेचे चित्रीकरण केले. महेश्वरला तुलनेने उष्ण हवामान असूनही या कलाकारांनी तेथे दिवसभर चित्रीकरण केले. या चित्रीकरणासंदर्भात प्रमुख कलाकार राहुल शर्मा म्हणाला, “आम्ही महेश्वरमध्ये तब्बल 20 दिवस चित्रीकरण केलं होतं.आम्हा सर्वांसाठी हा एक चांगला अनुभव होता. तिथल्या सुंदर स्थळांवर चित्रीकरण करण्याबरोबरच आम्हाला मालिकेतील सर्व कलाकार आणि कर्मचा-यांशी संवाद साधता आला.”राहुलने सांगितले, “महेशवरमध्ये तेव्हा फारच उकाडा होता आणि भर उन्हात चित्रीकरण करणं कधी कधी खूप त्रासाचं होत होतं. तरीही आम्ही तिथे उत्तम चित्रीकरण केलं.”आपली भूमिका अधिकाधिक वास्तववादी करण्यासाठी आजकाल बहुतेक कलाकार आपल्या भूमिकेला सर्वस्व देऊ लागले असून त्याचे प्रतिबिंब या मालिकेत पडलेले दिसेल, अशी आशा आहे.मालिकेत राहुल शर्मा राहुलची, छावी पांडे नम्रताची, शगुन कौर गौरीची, इक्बाल खान इंद्राची, माधवी गोगटे कलावतीची, सोमेश अगरवाल वैद्याची आणि श्याम मशालकर मनोजची भूमिका साकारत आहे.