Join us  

Majhi Tujhi Reshimgat: 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली मालिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 11:30 AM

Majhi Tujhi Reshimgath: या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेत कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतात.

ठळक मुद्देलोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या या मालिकेतून लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एक्झिट घेतल्याचं सांगण्यात येतं.

छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ '(Majhi Tujhi Reshimgath). अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका लोकप्रिय मालिकांच्या यादीत अव्वल स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या मालिकेत कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतात. मोहन जोशी (mohan joshi), श्रेयस तळपदे( shreyas talpade), संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade), प्रार्थना बेहरे (prarthana behare) या कलाकार मंडळींची तगडी फौज या मालिकेत पाहायला मिळते. मात्र, आता यातील दिग्गज कलाकाराने मालिकेतून एक्झिट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. 

 लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या या मालिकेतून लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एक्झिट घेतल्याचं सांगण्यात येतं. या मालिकेत संकर्षणने यशच्या मित्राची समीरची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने ही भूमिका अत्यंत सुंदररित्या साकारली होती. मात्र, आता संकर्षण यापुढे मालिकेत दिसणार नसल्याची चर्चा आहे.

आशा भोसलेंची नात देतीये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

नुकतंच महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे नाटक आणि चित्रपट प्रेक्षकांना थेट नाट्यगृहात वा चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर संकर्षण त्याच्या नाटकाकडे पुन्हा वळला आहे. त्यामुळेच पुढील काही काळ तो माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत दिसणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

संकर्षण कऱ्हाडे याने अभिनित केलेलं 'तू म्हणशील तसं..' हे नाटक लवकरच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निर्बंध उठवल्यामुळे २३ ऑक्टोबर रोजी या नाटकाचा प्रयोग बोरिवली येथील प्रबोधन ठाकरे आणि २४ ऑक्टोबर रोजी डॉ काशीनाथ घाणेकर, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे संकर्षण कऱ्हाडे सध्या त्याच्या नाटकाच्या दौऱ्यात व्यस्त असणार आहे. याच कारणामुळे तो काही काळासाठी 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेपासून दूर जाणार आहे. 

संकर्षण खरंच सोडणार का मालिका?

सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चांदरम्यान, 'लोकमत ऑनलाइन'ने संकर्षणसोबत संवाद साधला. यावेळी संकर्षणने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे