बिग बॉस 10 मधून बाहेर पडल्यावर करण नेहराने केला इंडियावालेंवर हा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 18:16 IST
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता करण मेहरा नुकताच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. बिग ...
बिग बॉस 10 मधून बाहेर पडल्यावर करण नेहराने केला इंडियावालेंवर हा आरोप
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता करण मेहरा नुकताच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. बिग बॉस 10 मधून बाहेर पडल्यावर इंडियावाल्यांना मिळालेल्या संधीचा ते गैरफायदा घेत आहेत असे त्याचे म्हणणे आहे.बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सगळ्या पर्वांमध्ये सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण पहिल्यांदाच पर्वात सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकदेखील झळकले आहेत. खास ऑडिशन घेऊन या सामान्य लोकांची निवड करण्यात आली आहे. या सामान्य लोकांना म्हणजेच इंडियावाल्यांनाच आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले होते. पण पहिल्यांदाच करण मेहरा हा सेलिब्रिटी या घरातून बाहेर पडला. करणची लोकप्रियता ही प्रचंड आहे. त्यामुळे तो घराच्या बाहेर पडल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. करणने घरातून बाहेर पडल्यावर इंडियावाल्यांवर एक आरोप केला आहे. करण मेहराच्या मते या कार्यक्रमाने इंडियावाल्यांना खूप चांगली संधी मिळवून दिली आहे. पण ते या संधीचा योग्यप्रकारे वापर करत नाहीये. घरात सेलिब्रिटींसोबत इंडियावाले ज्याप्रकारे वागत आहेत, त्याप्रमाणे कोणताही सामान्य माणूस आपल्या घरात वागत असेल असे मला वाटत नाही असे त्याने म्हटले आहे. पुढे करण असेही सांगतो, "सेलिब्रिटींसोबत इंडियावाले सतत भांडत आहेत, त्यांना अतिशय वाईट शब्दांत सुनावत आहेत. त्यांच्या तुलनेत सगळेच सेलिब्रिटी खूपच चांगले वागत आहेत. इंडियावाले सतत काही ना काही कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत."