Join us  

'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्याचा घटस्फोट, लग्नानंतर दोनच वर्षात मोडला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 2:23 PM

९ महिने डेट केल्यानंतर दोघंही २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय हिंदी मालिका 'कुमकुम भाग्य' मधील अभिनेता अभिषेक मलिक(Abhishek Malik) आणि पत्नी सुहानी चौधरी (Suhani Chaudhary) घटस्फोट घेत आहेत. दोघांनीही याला दुजोरा दिला असून एकमेकांच्या सहमतीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या दोनच वर्षात दोघंही विभक्त होत आहेत. ९ महिने डेट केल्यानंतर दोघंही २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.

अभिषेक मलिकने सांगितले की, 'आमच्या मनात कोणतीही चुकीची भावना नाही.आम्ही यापुढेही एकमेकांसोबत चांगलं राहू.' तर सुहानी म्हणाली, "आमच्यात काही मतभेद होते हे आम्हाला सोबत राहायला लागल्यानंतर समजलं. यानंतर आम्हाला याची जाणीव झाली की आम्ही वेगवेगळं राहून आमच्या आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. विभक्त होणं हा कदाचित आमच्यासाठी योग्य निर्णय आहे. मी अभिषेकच्या उज्वल भविष्याची कामना करते."

2021 साली दिल्ली येथे अभिषेक आणि सुहानी लग्नबंधनात अडकले होते. तेव्हा अभिषेक म्हणाला होता, "लॉकडाऊमध्ये मी दिल्ली गेलो असता माझी आणि सुहानीची ओळख झाली. मी तिचा नंबर घेतला. आमच्यात काहीतरी नक्कीच होईल असं आम्हाला दोघांनाही वाटत होतं. स्क्रीनवर आम्ही अनेकदा लग्न करतो पण खऱ्या आयुष्यात लग्न करणं, पत्नीसोबत घरी जाणं हे खूपच जादुई आहे."

अभिषेकने २०१२ साली 'छल-शह और मात' मालिकेतून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने 'दिल की नजर से खूबसूरत', 'पुनर्विवाह-एक नई उम्मीद', 'कैसी ये यारियां', 'भाग्यलक्ष्मी'या मालिकांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोटसेलिब्रिटी