Join us

थ्रिलर चित्रपट पुन्हा पाहण्याजोगे नसतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 15:50 IST

दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्यानुसार अनेक लोकांना वाटते की, थ्रिलर चित्रपटाला वारंवार किंमत मिळत नाही. बॉलीवूड हे रोमँटिक चित्रपटासाठी प्रसिद्ध ...

दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्यानुसार अनेक लोकांना वाटते की, थ्रिलर चित्रपटाला वारंवार किंमत मिळत नाही. बॉलीवूड हे रोमँटिक चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. घोष यांच्या अनुसार थ्रिलर चित्रपटाविषयी वेगवेगळ्या मनगढंत कहाण्या आहेत. ‘याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. ज्यावेळी मी लोकांना कथा विकण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी बºयाच जणांना वाटते किती मुर्खासारखी गोष्ट आहे. दुर्दैवाने चित्रपटाचा शेवट माहिती असल्याने, त्या चित्रपटाला किंमत उरत नाही. त्यांच्या अनुसार थ्रिलर चित्रपट दुसºयांदा पाहण्याच्या लायकीचा नसतो, असेही घोष म्हणाले.चित्रपटाचा क्लायमेक्स फक्त १० मिनिटांचा असतो. त्यांच्या दृष्टीने चित्रपटाचा एकूणातील प्रवास महत्वाचा आहे. थ्रिलर चित्रपट वारंवार पाहण्याजोगे नसतात, ही लोकांची मानसिकता चुकीचे असल्याचेही घोष म्हणाले.टी३एन हा चित्रपट तीन लोकांची कथा आहे. न्याय आणि पापमुक्तीच्या प्रार्थनेसंदर्भात त्यांच्या वेगवेगळ्या श्रद्धा असतात. अमिताभ बच्चन यांनी जॉन बिश्वास यांची भूमिका साकारली आहे. जे आठ वर्षे न्यायासाठी झगडत असतात.