Join us  

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर... या चित्रपटाद्वारे करणार कमबॅक?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 7:18 PM

शाहरुखच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. शाहरुख लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असून त्याने एक चित्रपट स्वीकारला असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देशाहरुखने यशराज बॅनराचा चित्रपट साईन केला असून या चित्रपटाची कथा खुद्द आदित्य चोप्राने लिहिली असल्याचे म्हटले जात आहे. यश राज फिल्मसला ५० वर्षं पूर्ण होत असल्याने हा चित्रपट यशराज बॅनरसाठी खूपच खास आहे.

शाहरुखने बॉलिवूडमधून काही महिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने एप्रिलमध्ये सांगितले होते की, तो काही वेळ त्याच्या कुटुंबियांना देणार आहे. त्यामुळे आता शाहरुख कधी परतणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. शाहरुख लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असून त्याने एक चित्रपट स्वीकारला असल्याचे म्हटले जात आहे.

शाहरुख खान आणि यश राज बॅनर यांचे खूपच जवळचे नाते आहे. शाहरुखच्या कारकिर्दीतील अनेक हिट चित्रपट हे यशराज बॅनरचेच आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, चक दे इंडिया, दिल तो पागल है, रब ने बना दी जोडी, जब तक है जान यांसारख्या यशराजच्या अनेक चित्रपटांचा शाहरुखच्या करिअरमध्ये मोठा सहभाग आहे. आता शाहरुखने यशराज बॅनराचा चित्रपट साईन केला असून या चित्रपटाची कथा खुद्द आदित्य चोप्राने लिहिली असल्याची बातमी काईमोई या वेबसाईटने दिली आहे. यश राज फिल्मसला ५० वर्षं पूर्ण होत असल्याने हा चित्रपट यशराज बॅनरसाठी खूपच खास आहे. 

यशराज बॅनरकडून किंवा शाहरुखकडून अद्याप तरी या चित्रपटाबाबत काहीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे खरंच या चित्रपटात काय पाहायला मिळेल हे पाहाण्यासाठी प्रेक्षकांना काही दिवस तरी वाट पाहावी लागेल.

शाहरुख खानचा झिरो हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरुखला चांगलाच धक्का बसला आहे आणि त्यामुळे तो कोणताच चित्रपट स्वीकारत नाहीये असे म्हटले जात होते. झिरो या चित्रपटात त्याच्यासोबतच अनुष्का शर्मा, कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहर, आदित्य चोप्राची मैत्री कुणापासूनही लपलेली नाही. शाहरूखने करण आणि आदित्यासोबत अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी शाहरूखने करण आणि आदित्यसोबत काम करण्याचा स्वत:चा अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला होता. सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहित त्याने करण आणि आदित्यचे आभार मानले होते.

 

‘स्वप्न चांगली असतात. पण त्या स्वप्नांना दिशा मिळाली नाही तर ती स्वप्न निरर्थक ठरतात. या दोघांनी माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण केले. तुमच्या स्वप्नांपेक्षा, तुमची स्वप्नं पूर्ण करणारी माणसं अधिक महत्त्वाची आणि गरजेची असतात,’असे शाहरूखने या पोस्टमध्ये लिहिले होते.  

टॅग्स :शाहरुख खानकरण जोहरआदित्य चोप्रा