Join us  

या कारणामुळे होऊ शकले नव्हते अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 6:19 PM

अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न व्हायच्याआधी अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत त्याचा साखरपुडा झाला होता.

ठळक मुद्देजया यांनी सांगितले होते की, आपली सूनही चांगल्या संस्काराची असावी असे मला नेहमीच वाटत होते आणि तेच संस्कार ऐश्वर्यामध्ये आहेत.

अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस असून त्याने रेफ्युजी या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने धूम, बंटी और बबली, सरकार, गुरू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्याचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत झाले असल्याचे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तो त्याची पत्नी आणि मुलगी आराध्यासोबत त्याच्या आयुष्यात प्रचंड खूश आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न व्हायच्याआधी अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत त्याचा साखरपुडा झाला होता. पण काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही. अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा मोडल्यावर त्याच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. 

करिश्मा आणि अभिषेकने 'हा... मैंने भी प्यार किया' या चित्रपटात एकत्र काम केले होते. करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. अभिषेक आणि करिश्मा यांच्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टीला आता अनेक वर्षं झाले आहेत. ते दोघे आपआपल्या आयुष्यात स्थिरावले देखील आहेत.

करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ही मुलाखत २००८ मध्ये छापून आली होती.

जया बच्चन यांनी या मुलाखतीत त्यांच्या कुटूंबाची मूल्ये, त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना कशाप्रकारे संस्कार दिले याविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या. तसेच या मुलाखतीत त्यांनी ऐश्वर्या रायची सून म्हणून निवड का केली याविषयी देखील खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, आपली सूनही चांगल्या संस्काराची असावी असे मला नेहमीच वाटत होते आणि तेच संस्कार ऐश्वर्यामध्ये आहेत.

जया बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर त्यांना विचारण्यात आले होते की, याच कारणामुळे करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न मोडले होते का? त्यावर जया बच्चन यांनी काही सेकंद थांबून उत्तर दिले होते. त्यांच्या या पॉजमध्ये उत्तर असल्याचे सगळ्यांनाच कळले होते. त्यानंतर काही सेकंदानंतर त्या म्हणाल्या होत्या की, करिश्मा ही कपूर कुटुंबातील आहे. कपूर कुटुंबातील सगळ्यांनाच खूप चांगले संस्कार आहेत. तिचे वडील आणि मी अनेक वर्षांपासून खूप चांगले फ्रेंड्स आहोत. त्यांचे माझ्या पतीसोबत देखील खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे कुटुंबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये असे मला वाटते.

टॅग्स :अभिषेक बच्चनकरिश्मा कपूरऐश्वर्या राय बच्चन