Join us  

‘अजब प्रेम की गजब कहानी’ला 11 वर्षे पूर्ण ; रिअल लाईफमध्ये तंतोतंत खरा ठरला हा एक सीन

By रूपाली मुधोळकर | Published: November 06, 2020 4:49 PM

रणबीर कपूर व कतरिना कैफ स्टारर ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमाला आज 6 नोव्हेंबरला 11 वर्षे पूर्ण झालीत.

ठळक मुद्दे‘अजब प्रेम की गजब कहानी’ हा सिनेमा सर्वप्रथम रणबीर कपूर नाही तर शाहिद कपूरला ऑफर झाला होता.

रणबीर कपूरकतरिना कैफ स्टारर ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमाला आज 6 नोव्हेंबरला 11 वर्षे पूर्ण झालीत. राजकुमार संतोषीने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 2009 साली रिलीज झाला होता. सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला होता. रणबीर व कतरिनाची रोमॅन्टिक केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली होती. या सिनेमात अनेक मजेदार सीन्स आहेत. आश्चर्य वाटेल पण यापैकीच एक सीन रिअल लाईफमध्ये अगदी तंतोतंत खरा ठरला.

‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमात सलमान कॅमिओ रोलमध्ये आहे. एका सीनमध्ये सलमान, रणबीर व कॅट यांच्यावर एक मजेदार सीन चित्रीत करण्यात आला होता. यात रणबीर कतरिनाची सलमानशी भेट घालून देतो.  या सीनमध्ये ‘तू तो ऐसे डर रहा है, जैसे मेरी गर्लफ्रेन्ड को अपना कहकर मिलवा रहा है,’असे सलमान रणबीरला म्हणतो. ख-या आयुष्यात अगदी सेम घडले. होय, कारण याच सिनेमानंतर कतरिनाने सलमानसोबतचे संबध तोडले होते. इतकेच नाही तर याच सिनेमाच्या रिलीजनंतर रणबीर व कतरिनाच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.रिपोर्टनुसार, रणबीर आयुष्यात येण्याआधी कतरिना सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र ‘अजब प्रेम की गजब कहानी’च्या सेटवर रणबीर व कतरिना असे काही जवळ आलेत की, त्याच्या प्रेमाची नवी कहानी सुरु झाली.

6 वर्षानंतर ब्रेकअपकतरिनाआधी रणबीर दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांच्याही ब्रेकअपनंतर रणबीरच्या आयुष्यात कॅटची एन्ट्री झाले. जवळजवळ सहा वर्षे दोघेही एकमेकांसोबत नात्यात होते.  2016 मध्ये रणबीर व कॅटचे ब्रेकअप झाले. असे म्हणतात की, सून म्हणून कतरिना कपूर कुटुंबाला पसंत नव्हती. यामुळे दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. सध्या रणबीर आलिया भटला डेट करतोय आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. कतरिनाच्या आयुष्यात सध्या विकी कौशल असल्याची चर्चा आहे.

 शाहिद होता पहिली पसंत‘अजब प्रेम की गजब कहानी’ हा सिनेमा सर्वप्रथम रणबीर कपूर नाही तर शाहिद कपूरला ऑफर झाला होता. चित्रपटातील प्रेम शंकरची भूमिका शाहिदने साकारावी, अशी राजकुमार संतोषी यांची भरून इच्छा होती. पण शाहिदने या भूमिकेस नकार दिला. चित्रपटातील प्रेम शंकर शर्माची भूमिका ‘जब वुई मेट’मधील आदित्य कश्यपसारखी आहे, त्यात काहीही नावीन्य नाही, असे म्हणून शाहिदने हीभूमिका नाकारली होती. त्यानंतर रणबीरची यात वर्णी लागली.

टॅग्स :रणबीर कपूरकतरिना कैफसलमान खान