अक्षय कुमार(Akshay Kumar)च्या 'हेरी फेरी ३' (Hera Pheri 3) चित्रपटातून परेश रावल (Paresh Rawal) यांनी अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमधून परेश रावल यांनी का माघार घेतली असेल यामागचं कारण कोणालाच समजले नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की परेश यांनी पहिल्यांदाच हे केले आहे, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण बाबूराव आपटे यांनी खिलाडी कुमारसोबत हे यापूर्वीही केले आहे. त्यांनी अचानक ओएमजी २ मधूनही माघार घेतली होती.
२०२३ मध्ये आलेल्या 'ओएमजी २' (ओह माय गॉड २) चित्रपटातूनही परेश रावल यांनी माघार घेतली होती. २०१२ मध्ये आलेल्या ओएमजी चित्रपटाने विक्रमी कमाई केली. त्यानंतर २०२३ मध्ये त्याचा सीक्वल आला. त्याचे नाव ओएमजी २ होते. त्यात परेश रावल यांच्याऐवजी पंकज त्रिपाठी दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परेश यांनी या चित्रपटातूनही माघार घेतली होती. त्याचे कारण कथेशी संबंधित काही मुद्दे आहेत.
हे होतं कारणखरंतर, एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेण्यामागील कारण शेअर केले होते. अभिनेत्याने म्हटले होते की, 'मला चित्रपटाची कथा आवडली नाही. म्हणूनच मी चित्रपटाचा भाग झालो नाही. फक्त पहिल्या भागाची कथा पुढे नेण्यासाठी मला सीक्वल बनवायला आवडत नाही. जसे आपण हेरा फेरीमध्ये केले होते.'
जास्त हवे होते मानधनअनेक रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की, परेश रावल यांनी कमी मानधनामुळे 'ओएमजी २' करण्यास नकार दिला होता. त्यांचा असा विश्वास होता की पहिल्या भागाने विक्रमी कमाई केली आहे. ज्यामध्ये ते मुख्य भूमिकेत होते. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या बाजारभावानुसार पैसे मिळायला हवेत. परंतु निर्मात्यांना जास्त पैसे देण्यात रस नव्हता कारण त्यांना चित्रपटाचे बजेट वाढवायचे नव्हते. परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्यानंतर अक्षय कुमारने त्यांना २५ कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रियदर्शननंतर सुनील शेट्टी यांनाही परेश यांनी चित्रपट सोडल्याने धक्का बसला आहे.