Join us  

'वेगळं होणंच योग्य होतं, कारण..'; घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Naga Chaitanya ने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 1:57 PM

Naga Chaitanya: ऑक्टोबर २०२१ मध्ये समंथा आणि नागा चैतन्य यांनी जॉइन स्टेटमेंट देऊन त्यांच्या घटस्फोटाची अनाउसमेंट केली होती.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य  (Naga Chaitanya) आणि समंथा रुथ प्रभू  (samantha ruth prabhu) यांचा घटस्फोट होऊन आता बरेच दिवस उलटून गेले आहेत. मात्र, तरीदेखील या जोडीची चर्चा काही केल्या कमी होत नाही. अनेकदा या दोघांना त्यांच्या नात्याविषयी, घटस्फोटाविषयी प्रश्न विचारले जातात. अलिकडेच समंथाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता, पहिल्यांदाच नागा चैतन्य या घटस्फोटावर व्यक्त झाला आहे. विशेष म्हणजे त्याने दिलेली प्रतिक्रिया ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत.

ऑक्टोबर २०२१ मध्ये समंथा आणि नागा चैतन्य यांनी जॉइन स्टेटमेंट देऊन त्यांच्या घटस्फोटाची अनाउसमेंट केली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये एकच नाराजी उमटली होती. ही जोडी विभक्त होऊ नये अशी अनेकांची इच्छा होती. परंतु, समंथा- नागा चैतन्यने कायदेशीररित्या विभक्त होणं पसंत केलं. त्यानंतर जवळपास ४ महिन्यांनी नागा चैतन्यने याविषयी प्रतिक्रिया दिली. 

सध्या नागा चैतन्य त्याच्या Bangarraju या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याला समंथाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. "वेगळं होणंच योग्य होतं. हा निर्णय आम्ही परस्पर संमतीने घेतला. आणि हा निर्णय दोघांच्याही आनंदासाठी घेतलेला आहे. जर ती आनंदात असेल तर मी सुद्धा आनंदातच आहे. अशा परिस्थितीत घटस्फोट हाच योग्य निर्णय आहे", असं नागा चैतन्य म्हणाला.

दरम्यान, समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट होऊन आता बराच काळ लोटला आहे. दोघांनीही आता त्यांच्या करिअरकडे लक्ष वळवलं आहे. अलिकडेच समंथा पुष्पा या सुपरहिट चित्रपटात झळकली होती.  या चित्रपटात तिने Oo Antava Oo Oo Antava या गाण्यात अल्लू अर्जुनसोबत स्क्रिन शेअर केली आहे. तर, नागा चैतन्यदेखील Bangarraju या चित्रपटात झळकणार आहे. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodबॉलिवूडसेलिब्रिटी