Join us  

'२५ व्या वर्षी लग्नाचा निर्णय आणि मग...'; अरबाजसोबतच्या घटस्फोटावर मलायका अरोरा काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 12:56 PM

नुकत्याच एका मुलाखतीत मलायकानं पुन्हा एकदा लग्न आणि घटस्फोटाबद्दल खुलेपणानं भाष्य केलं आहे. 

अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  आपल्या दमदार अभिनयानं तिनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागच्या काही वर्षात मलायका तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत आहे. कधी मलायकाच्या फिटनेसची चर्चा असते. तर कधी तिच्या स्टाइलची. पण सर्वाधिक चर्चा या मलायका आणि अर्जुन कपूर यांचं अफेअर आणि अरबाजसोबतच्या घटस्फोटाच्या असतात. नुकत्याच एका मुलाखतीत मलायकानं पुन्हा एकदा लग्न आणि घटस्फोटाबद्दल खुलेपणानं भाष्य केलं आहे. 

मलायका अरोरा ही वयाच्या २५ व्या वर्षी अरबाज खानशी लग्न करण्याच्या निर्णयावर आणि घटस्फोटावर व्यक्त झाली. मलायका म्हणाली, 'मला माझ्या कुटुंबाकडून कोणत्याही दबावाचा सामना करावा लागला नाही. याच वयात लग्न करावं लागेल असं आमच्या घरी काहीही नव्हतं. त्यांनी मला माझ्या पद्धतीनं माझं जीवन जगण्यास सांगितलं होतं. चांगल्या लोकांशी मैत्री करण्यास सांगितलं होतं. 

ती पुढे म्हणाली, 'माझ्या मनात काय आलं ते मला माहीत नाही. पण, मला वयाच्या 22-23 व्या वर्षी लग्न करायचं होतं. माझ्यावर कोणीही दबाव आणला नव्हता, परंतु मला ते करण्याची गरज वाटली. कारण माझ्याकडे सर्वोत्तम पर्याय होता. पण, लग्नाच्या अनेक वर्षांनी मला जाणवलं की मी अशी व्यक्ती बनले आहे जी मी नाहीत. अरबाजपासून वेगळे होण्याच्या निर्णयावर अला अनेकांनी  प्रश्न केले. माझी खिल्लीही उडवली'.

मलायकाने सांगितले की, 'अरबाजपासून घटस्फोटानंतर काही वेबसाइटवर माझ्या जीवनशैलीबद्दल लिहण्यात आलं होतं.  माझ्या कपड्यांबद्दल आणि ते किती महाग आहेत याबद्दल कोणीतरी एक लेख लिहिला होता. शिवाय, मला भरपूर पोटगी मिळाल्याचंही त्यांनी लिहलं होतं. हे वाचून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. पण, मी घटस्फोटाचा निर्णय घेतला. कारण, जर मी आनंदी राहिले तरच मी माझ्या मुलाला आनंदात ठेवू शकेल. 

 

टॅग्स :मलायका अरोरासेलिब्रिटीबॉलिवूडअर्जुन कपूरअरबाज खान