बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे करिना कपूर. बेबो नावाने ओळखल्या जाणा-या करिनाने २००० मध्ये ‘रिफ्युजी’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर २००१ मध्ये ती ‘कभी खुशी कभी गम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात झळकली. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये बेबोने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. पण याचदरम्यान एक वेळ अशीही आली, जेव्हा सगळेच संपले, असे करिनाला वाटले. होय, खुद्द करिनाने ह्युमन आॅफ बॉम्बे या फेसबुकवर पेजवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.
आता करिअर संपले,असेच त्यावेळी वाटले...! करिअरवर बोलली करिना कपूर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 12:05 IST
आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये बेबोने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. पण याचदरम्यान एक वेळ अशीही आली, जेव्हा सगळेच संपले, असे करिनाला वाटले.
आता करिअर संपले,असेच त्यावेळी वाटले...! करिअरवर बोलली करिना कपूर!!
ठळक मुद्दे२००७ मध्ये करिनाने आयुष्यातल्या या काळावर मात करत, पुन्हा नव्या जोमाने वापसी केली. ‘जब वी मेट’ या चित्रपटाने तिच्या करिअरला गती दिली.