ऐसे भी जाता नहीं कोई...! अमिताभ बच्चन यांची श्रीदेवींना आगळी-वेगळी श्रद्धांजली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 10:57 IST
श्रीदेवी अनंतात विलीन झाल्यात. पण त्या आज आपल्यात नाहीत, हे अजूनही चाहते मानायला तयार नाहीत. महानायक अमिताभ बच्चन यांना ...
ऐसे भी जाता नहीं कोई...! अमिताभ बच्चन यांची श्रीदेवींना आगळी-वेगळी श्रद्धांजली!!
श्रीदेवी अनंतात विलीन झाल्यात. पण त्या आज आपल्यात नाहीत, हे अजूनही चाहते मानायला तयार नाहीत. महानायक अमिताभ बच्चन यांना श्रीदेवींच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे. अद्यापही ते यातून सावरू शकलेले नाहीत. श्रीदेवींच्या अंत्यसंस्कारावरून परतल्यानंतर त्यांनी श्रीदेवींना आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली. ‘रहने को सदा देहर में आता नहीं कोई, तुम जैसे गये ऐसे भी जाता नहीं कोई...! जावेद अख्तर साहेबांनी श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्कारावेळी मला हा शेर (कैफी आझमी यांनी हा शेर लिहिलेला आहे.) ऐकवला. गुरू दत्त साहेबांच्या निधनावेळी हा लिहिला होता. पण आजही ते जसाच्या तसा लागू पडतोय, असे ते मला म्हणाले... ’असे टिष्ट्वट अमिताभ यांनी केले आहे. ALSO READ : महानायकाला ‘चांदनी’ निखळणार याची कुणकुण लागली होती?, बिग बींच्या एका पोस्टने चर्चांना उधाणश्रीदेवींच्या निधनापूर्वी अमिताभ यांनी एक पोस्ट लिहिली होती. ‘न जानें क्यों अजीबसी घबराहट हो रही हैं’, असे त्यांनी लिहिले होते. त्यानंतर काहीच तासांत श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी वाºयासारखी पसरली होती. अमिताभ यांनी श्रीदेवींच्या मृत्यूची कुणकुण तर लागली नव्हती ना, असा सवाल त्यामुळे सर्वत्र चर्चिला गेला होता. श्रीदेवींच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची बातमी बिग बींना दिली होती का? अशीही शंका उपस्थित करण्यात आली होती. श्रीदेवींच्या निधनानंतर अमिताभ कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्या दिवशी यांनी ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाचे शूटींगही रद्द केले होते. बिग बी व श्रीदेवी यांच्यात चांगली मैत्री होती. अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांचा ‘खुदा गवाह’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर श्रीदेवींचा कमबॅक सिनेमा ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये अमिताभ यांनी कॅमिओ केला होता.