बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. तिने मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे. सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे मत कंगनाने व्यक्त केले आहे.ती सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी चित्रपट 'धाकड'चे शूटिंग करते आहे. यावेळी तिने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कंगना राणौत पत्रकार परिषदेत म्हणाली की, देशातील अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना जोपर्यंत भर चौकात लटकवले जात नाही, तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत. त्या अनुषंगाने कडक कारवाई करत पाच-सहा उदाहरणे समाजासमोर ठेवली पाहिजेत.