Join us  

करण जोहर डेव्हिड धवनपेक्षाही लबाड...! गोविंदाने अशी केली होती करणची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 7:19 PM

2017 साली गोविंदाने करण जोहरवर बोचरी टीका केली होती. करणमुळेच आपला चित्रपट चालला नाही असा आरोप गोविंदाने केला होता.

ठळक मुद्देगोविंदाने करण वर घराणेशाहीचाही आरोप लावला होता. शिवाय ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये निमंत्रित न केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली होती.

गोविंदा (Govinda) आता बॉलिवूडमध्ये फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण म्हणून त्याची क्रेज कमी झालेली नाही. आजही या ना त्या कारणाने तो चर्चेत असतो. याच गोविंदाने एकदा करण जोहरवर ( Karan Johar) झोंबणारी टीका केली होती. करण जोहर मला कधीच साधाभोळा किंवा निरागस वाटला नाही, असे गोविंदाने म्हटले होते़. एका मुलाखतीत गोविंदा करण जोहरवर बरसला होता. (Govinda Once Opened Up About Karan Johar)

2017 साली गोविंदाने करण जोहरवर   बोचरी टीका केली होती. करणमुळेच आपला चित्रपट चालला नाही असा आरोप  गोविंदाने  केला होता. 2017 साली अनेक दिवसानंतर गोविंदाचा ‘आ गया हिरो’ हा चित्रपट आला होता. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या बरोबर एक आठवड्यानंतर करण जोहरने ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट प्रदर्शित केला. साहजिकच ‘आ गया हिरो’ला याचा जोरदार फटका बसला होता, यामुळे गोविंदा कमालीचा संतापला होता.याआधी गोविंदाने करण वर घराणेशाहीचाही आरोप लावला होता. शिवाय ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये निमंत्रित न केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली होती.‘गेल्या ३० वर्षांत त्याने कधीच मला घरी बोलावले नाही. मित्रपरिवारा व्यतिरिक्त इतर अभिनेत्यांकडे तो बघतो की नाही, ही शंकाच आहे. करण हा अजिबात दयाळू वगैरे नाही. तसा दिसत असेल तर तो त्याचा प्लान आहे.  मला तो कधीच सरळ किंवा निरागस वाटलाच नाही,असेही गोविंदा म्हणाला होता.

‘त्याने मला कधीच कॉफी विथ करण शो साठी बोलावले नाही,’ असेही गोविंदा म्हणाला होता. ही गोष्ट समजताच करणने यावर दिलगीरी व्यक्त केली होती.  आपण त्याला शो मध्ये बोलावणार आहोत. तो माझ्या शोमध्ये येणे, माझ्यासाठी सन्मानाची बाब असेन, अशा शब्दांत करणने दिलगीरी व्यक्त केली होती. पण याऊपर गोविंदाने त्याची दिलगीरी स्वीकारली नव्हती. ‘करण दाखवतो की तो खूप नम्र आणि सरळ आहे, परंतु तो मला डेव्हिड पेक्षा लबाड व खतरनाक वाटतो,’ अस गोविंदा म्हणाला होता.  

टॅग्स :गोविंदाकरण जोहर