Join us

Baaghi 2 New Song O Saathi Out : ​पाहा,‘बागी2’मधील टायगर श्रॉफ व दिशा पटनीचा कॉलेज रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 14:00 IST

काही दिवसांपूर्वीच ‘बागी2’चा ट्रेलर रिलीज झाला. पाठोपाठ ‘मुंडिया’ हे गाणेही रिलीज झाले. आता या चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. ‘ओ साथी’ असे या गाण्याचे बाले आहेत.

‘बागी2’कडे टायगर श्रॉफचे चाहते डोळे लावून बसले आहेत. या चित्रपटात टायगर पहिल्यांदा त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटनीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. साहजिकच,ही धमाकेदार जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘बागी2’चा ट्रेलर रिलीज झाला. पाठोपाठ ‘मुंडिया’ हे गाणेही रिलीज झाले. आता या चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. ‘ओ साथी’ असे या गाण्याचे बाले आहेत. ‘कॉलेजचे प्रेम नेहमीच खास असते. पाहा,रोनी व नेहाची प्रेमकहाणी,’ या कॅप्शनसह टायगरने हे गाणे आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहे. या गाण्यात टायगर व दिशा कॉलेज स्टुडंट्सच्या रूपात दिसत आहेत. दोघांचीही केमिस्ट्री लाजवाब अशीच आहेत. टायगर-दिशाचे रूसवे- फुगवे, चोरून लपून बोलणे हे सगळे पाहताना तुम्हाला तुमचे कॉलेजचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाहीत. गाण्यात दिसते त्याप्रमाणे टायगर दिशासाठी काहीही करायला तयार आहे. टायगरला भेटीच्याठिकाणी यायला उशीर होतो म्हणून दिशा रूसून बसणे. तिचा हा गोड रूसवा दूर करण्यासाठी दुसºया दिवशी टायगर काय करतो, हे तुम्ही या गाण्यात पाहू शकता. आतिफ असलमने गायलेले हे गाणे तुम्ही पाहायलाच हवे.  ALSO READ : अनोख्या अंदाजात लॉन्च झाला ‘बागी2’चा ट्रेलर! टायगर श्रॉफचे ‘deadly stunts’ पाहून व्हाल थक्क!!‘बागी2’ हा चित्रपट येत्या ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे.  ‘बागी’मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. पण  ‘बागी2’मध्ये श्रद्धाची जागा दिशाने घेतलीयं.  ‘बागी’ हा चित्रपट साबीर खानने दिग्दर्शित केला होता.  ‘बागी2’ मात्र अहमद खानने दिग्दर्शित केला आहे.  ‘बागी2’मध्ये टायगर श्रॉफ व त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हे दोघे प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. कॉलेजपासून सुरू होणाºया या लव्हस्टोरीत अनेक टिष्ट्वस्टही बघायला मिळणार आहे. टायगरऐवजी दिशाचे  दुसºया तरूणासोबत विवाह होतो. मध्यंतरानंतर दिशाच्या पतीचा मृत्यू होतो. तिचीही हत्या होते आणि तिच्या मुलाचे अपहरण केले जाते. यानंतर टायगर या मुलाला वाचवतो, असे याचे कथानक असल्याचे कळतेय.