Join us

पुरस्कार वापसी योग्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:48 IST

माझ्याकडे राष्ट्रीय पुरस्कार असता तर सध्याच्या असहिष्णुतेच्या वातावरणात मी तो नक्कीच परत केला असता, आपला विरोध आणि निषेध व्यक्त ...

माझ्याकडे राष्ट्रीय पुरस्कार असता तर सध्याच्या असहिष्णुतेच्या वातावरणात मी तो नक्कीच परत केला असता, आपला विरोध आणि निषेध व्यक्त करण्याचा तो सर्वांत प्रभावी मार्ग आहे, अशी भावना बॉलिवूड दिग्दर्शक झोया अख्तर हिने व्यक्त केली.देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करताना ती म्हणाली, सरकारला विरोध दर्शविण्यासाठी पुरस्कार वापसी हा सर्वाधिक धाडसाचा निर्णय आहे. 'मामी' या चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान ती बोलत होती.झोयाच्या या मताला अभिनेता रितेश देशमुख, जॅकी श्रॉफ व चित्रपट निर्माता सुधीर मिश्रा यांनीही पाठिंबा दर्शविला.