Join us  

वाचा अक्षय कुमार का म्हणाला, ट्विंकलने माझ्यापुढे टेकले आहेत हात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 6:00 AM

अक्षय कुमारने नुकतेच याविषयी द कपिल शर्मा शो मध्ये सांगितले.

ठळक मुद्देअर्चनाने कुतुहलाने अक्षयला विचारले की, “तू कोणत्याही सुरक्षा कवचाशिवाय इतका जोखमी स्टंट केल्याचे तुझी पत्नी ट्विंकल खन्नाला समजले, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती?” यावर अक्षयने हसत हसत उत्तर दिले, “तिने माझ्यापुढे हात टेकले आहेत!”  

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये अक्षय कुमार, कतरिना कैफ, रोहित शेट्टी आणि करण जोहर हजेरी लावणार आहेत. ते या कार्यक्रमात आपल्या सूर्यवंशी या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत.

सूर्यवंशी टीमने कपिल शर्मासोबत सेटवर खूप धमाल मस्ती केली. तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपितं देखील कपिलला सांगितली. रोहित शेट्टीने या कार्यक्रमात अक्षय कुमारच्या अद्भुत स्टंट्सबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले, “हा चित्रपट म्हणजे 90 टक्के अ‍ॅक्शन दृश्यांनी भरलेला आहे. ही सगळी दृश्यं अक्षयवर चित्रीत करण्यात आली आहेत. त्यात एका दृश्यात बाइक चालवत असताना त्यावरून हेलिकॉप्टरवर उडी मारण्याचा स्टंट अक्षयने कोणत्याही हार्नेसशिवाय केला. तो पाहून मी आणि सर्व क्रू सदस्य अवाक झालो होतो. सुरुवातीला आम्ही बाइकवरून हेलिकॉप्टरवर उडी मारण्याच्या दृश्यात एक कट ठेवला होता, जेणेकरून अक्षयला हार्नेस बांधता येऊ शकेल. पण आम्हाला माहीतच नव्हते अक्षय त्या पायलटशी कधी बोलला आणि त्याने ते अ‍ॅक्शन दृश्य हार्नेसशिवाय करण्यास अक्षयला मदत केली.”

 अर्चनाने कुतुहलाने अक्षयला विचारले की, “तू कोणत्याही सुरक्षा कवचाशिवाय इतका जोखमी स्टंट केल्याचे तुझी पत्नी ट्विंकल खन्नाला समजले, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती?” यावर अक्षयने हसत हसत उत्तर दिले, “तिने माझ्यापुढे हात टेकले आहेत!”

 या कार्यक्रमात पुढे कपिलने अक्षयला सूर्यवंशीबद्दल काय अपेक्षा आहेत असे विचारले, कारण त्याच्या या आधीच्या ‘गुड न्यूज’ने 200 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला होता. यावर खिलाडी कुमार उत्तरला, “माझा या आकड्यांवर विश्वास नाही. मी इथे टिकून राहणे तेवढे महत्त्वाचे आहे. कारण चित्रपटात अभिनयाची संधी मिळणे सोपे आहे. पण या इंडस्ट्रीत टिकून राहून सतत चांगले काम करत राहणे खूपच कठीण आहे.”

 

टॅग्स :अक्षय कुमारसूर्यवंशीरोहित शेट्टी