Join us  

" शेवटी नियतीच्या जे मनात असतं..." अभिनेत्री कंगना राणौतबद्दल एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांनी व्यक्त केली खंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 5:50 PM

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनी बऱ्याच वर्षानंतर आपला मुलगा आणि कंगना राणौत यांच्या नात्यावर भाष्य केलं. 

Shekhar Suman Reaction : बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भंसाली यांच्या हिरामंडी या वेबसिरीजची सर्वत्र चर्चा रंगताना दिसतेय. या बहुप्रतिक्षित वेब- सिरीजमध्ये अभिनेते  शेखर सुमन आणि त्यांचा मुलगा अध्ययन सुमन झळकणार आहेत. 

अलिकडेच शेखर सुमन यांनी  डीएनएला दिलेल्या मुलाखतीत मुलगा अध्ययन आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्या ब्रेकअप संदर्भात खुलासा केला आहे. साधारणत: २००८ मध्ये कंगना आणि अध्ययनची  'राज- द मिस्ट्री' या सिनेमाच्या सेटवर भेट झाली. जवळपास १ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर काही वैयक्तिक मतभेदांमुळे या दोघांमध्ये ब्रेकअप झालं. त्याच दरम्यान शेखर सुमन यांनी कंगनावर काळी जादू केल्याचा गंभीर आरोप सुद्धा केला होता.

''आपण सर्वजण जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतो. आज आपल्याला जे योग्य वाटतंय  गरजेचं नाही की ते उद्या देखील योग्यच असेल. आयुष्यात कोणालाही नातं निर्माण करून त्याला पूर्णविराम देत, किंवा स्वत: ला सावरत पुढे जावं असं वाटत नाही. प्रत्येकाला आपलं नातं स्थिर असावं असंच  वाटत असतं'', असं  शेखर सुमन मुलाखती दरम्यान म्हटलं.

 त्याचबरोबर ते म्हणाले, ''कंगना आणि अध्ययन यांच नात पुढे गेलं नाही, कदाचित नियतीला ते मान्य नसेल. त्यामुळे आपण भूतकाळाकडे देखील सकारात्मक दृष्टीने पाहणं गरजेच आहे. जे व्हायचं ते झालं त्यामुळे त्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी वाईट भावना नाहीत. काही गोष्टी परिस्थितीनूसार घडतात त्यामुळे आपण मागे वळून पाहिलं तरी प्रेमाने पाहायला हवं.''

''आम्ही आजही त्या गोष्टी मनात साचवून ठेवल्या नाहीत, माझ्या कुटुंबियांसह अध्ययन देखील आयुष्यात खूप पुढे निघून गेलाय. त्यामुळे घडून गेलेल्या गोष्टींवर बोलणारे आम्ही कोण?'' असं शेखर सुमन म्हणाले.

टॅग्स :कंगना राणौतशेखर सुमनअध्ययन सुमनबॉलिवूडसेलिब्रिटी