Join us  

अमृता राव आणि आरजे अनमोलनं २०१४ साली केलं होतं गुपचूप लग्न?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 3:05 PM

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता राव (Amrita Rao) आणि आरजे अनमोल (RJ Anmol) यांनी ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले होते

अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आणि आरजे अनमोल (RJ Anmol) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता राव आणि आरजे अनमोल यांनी ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले होते आणि त्यांनीदेखील हेच म्हटले होते. मात्र या जोडप्याने त्यांच्या ट्रेंडिंग यूट्यूब मालिका 'कपल ऑफ थिंग्ज' मधील अलीकडील भागामध्ये एक मोठा खुलासा केला आहे. अमृता आणि अनमोलने २०१६ मध्ये जगासमोर त्यांच्या लग्नाची घोषणा करण्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये गुपचूप लग्न केल्याचे उघड झाले.

अमृता राव आणि आरजे अनमोलने सांगितले की, २०१४ मधला 'सिक्रेट विवाह' आमच्यासाठी अत्यंत रोमांचक होता. त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी एखाद्या थ्रिलरसारखी होती! 'कपल ऑफ थिंग्ज'च्या पुढच्या भागात आम्ही आमच्या लग्नाच्या वेळची पुनरावृत्ती करताना आणि शेअर करताना आम्ही त्याच उत्साहातून जात आहोत." ते त्यांच्या चाहत्यांचा उत्साह अजून वाढवण्यासाठी या एपिसोडच्या शेवटी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय.

अमृता रावने २००२ मध्ये ‘अब के बरस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यांनतर ती ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटातून मिळाली. 

टॅग्स :अमृता राव