Join us

पश्चिम विदर्भातील १७ प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग; ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात ९९.३५ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:49 IST

Vidarbha Water Update : सततच्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्पापैकी १७ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग केला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

सततच्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्पापैकी १७ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग केला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. यावर्षी सिंचन प्रकल्प तुडुंब भरल्याने रब्बी व उन्हाळी पिकांसाठी सिंचनाची सोय झाली आहे.

पश्चिम विदर्भातीलअकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्प आहेत. यात उर्ध्व वर्धा, पूस, अरुणावती, बेंबळा, नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठ्या पाच प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे.

शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, पंढरी, गर्गा, बोर्डी नाला, अधरपूस सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, निगुर्णा, मोर्णा, उमा, घुंगशी बॅरेज, अडाण, सोनल, एकबुर्जी, ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी असे २७ मध्यम प्रकल्प आहेत.

यातील अकोला जिल्ह्यातील मोर्णा व उमा वाशिम जिल्ह्यातील अडाण व सोनल बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, पलढग, मस व उतावळी चार या मध्यम प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे.

जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार रोजी ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात ९९.३५ टक्के जलसाठा उपलब्ध असून, २७ मध्यम सिंचन प्रकल्पात ८९.०३ टक्के जलसाठा आहे.

तिसऱ्यांदा सोडले पाणी

• १ नोव्हेंबरच्या अहवालानुसार पाचही जिल्ह्यांतील २५३ लघु प्रकल्पात ९३.०६ टक्के जलसाठा आहे. एकूणच अलीकडच्या काही वर्षात पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातून तिसऱ्यांदा पाणी नदीपात्रात सोडावे लागत आहे.

• दरम्यान, यावर्षी मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी मिळेलच. उन्हाळी पिकांनादेखील पाणी सोडले जाणार का, हे भविष्यातील पाणी नियोजनावर अवलंबून राहणार आहे.

• उपलब्ध साठा शेतकऱ्यांची मागणी पाहून नियोजन केले जाणार आहे.

हेही वाचा : पाणंद रस्त्यांचा मिटलेला वाद आता पुन्हा उद्भवणार नाही! स्थळ पंचनामा आणि जिओ टॅग फोटो बंधनकारक

English
हिंदी सारांश
Web Title : West Vidarbha Dams Release Water Third Time; Reservoirs Near Full

Web Summary : West Vidarbha dams release water for the third time due to continuous rains. Reservoirs are nearly full, ensuring irrigation for Rabi and summer crops across Akola, Washim, Buldhana, Amravati, and Yavatmal districts. Ample water availability will facilitate irrigation, subject to future planning and farmer demand.
टॅग्स :अकोलाअरुणावती धरणखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरपेनटाकळी प्रकल्पनळगंगा धरणविदर्भपाणीनदी