Vidarbha Weather Update : राज्यात वेळेत दाखल झालेला मान्सून विदर्भासाठी मात्र 'विलंबीत पाहुणा' ठरला आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. (Vidarbha Weather Update)
पेरण्या रखडल्या, जमिनी कोरड्या आणि बियाण्यांचाही तुटवडा... या तिहेरी संकटात सरकारकडून तातडीच्या उपाययोजनेची अपेक्षा वाढली आहे. राज्यात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्याचा मोठा भाग पावसाच्या प्रतीक्षेत कोरडा पडलेला आहे. (Vidarbha Weather Update)
कोकण, पुणे आणि नाशिक विभागात समाधानकारक पाऊस झाला असताना नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभागात जून महिन्यात केवळ १०० मिमीच्याही खाली पावसाची नोंद झाली आहे.(Vidarbha Weather Update)
खरीप हंगाम रखडला, पेरण्या थांबल्या
* विदर्भ व मराठवाड्यात मुख्यतः सोयाबीन, कपाशी, तूर यासारख्या पिकांची लागवड होते.
* मात्र, पावसाअभावी बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या असून जमिनी नांगरून ठेवलेल्या आहेत.
* यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड चिंतेचं वातावरण आहे.
विभागनिहाय जून अखेर पावसाची स्थिती (२३ जूनपर्यंत)
विभाग / जिल्हा | पावसाचं प्रमाण (मिमी) | सरासरीच्या टक्केवारीत |
---|---|---|
कोकण | ५२३.९ | १०३.२ % |
पुणे | १६३.९ | १०७.६ % |
नाशिक | १०५.९ | १००.५ % |
अमरावती | ५७.४ | ५०.७ % |
संभाजीनगर | ४५.७ | ४१.० % |
नागपूर | ४०.० | २७.९ % |
अमरावती जिल्ह्यातील पावसाची स्थिती (२३ जूनपर्यंत)
तालुका | पावसाचं प्रमाण (मिमी) |
---|---|
मोर्शी | ३४.१ |
धारणी | ३५.८ |
भातकुली | ४०.० |
धामणगाव | ५२.० |
दर्यापूर | ६१.२ |
नांदगाव खंडेश्वर | ५५.० |
तिवसा | ६२.६ |
चांदूर बाजार | ७०.४ |
अमरावती तालुका | ७७.६ |
शेतकऱ्यांचे संकट : अंकुर फुटून कीड फस्त करतेय
* अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पेरली, पण पावसाअभावी अंकुर फुटल्यानंतर 'वाणी' या किडीने नुकसान केले आहे.
* विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे तातडीने बियाणे, सल्ला व उपाययोजनांची मागणी केली आहे.
* शेतकरी विशिष्ट वाण मागत असले तरी जिल्हा कृषी विभागाने 'उत्पादन सारखं आहे, कोणताही वाण घ्या' असा सल्ला दिला आहे.
शुभवार्ता : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे संकेत
* उत्तर बंगालच्या उपसागरात नवीन चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भात पावसाचे पुनरागमन अपेक्षित.
* भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भासाठी पाच दिवसांचा 'यलो अलर्ट' दिला आहे.
* अमरावती, नागपूर परिसरात मंगळवारपासून हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज.
विदर्भात जून महिन्यात अपेक्षित पावसाचा मोठा अभाव असल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत. आता हवामान खात्याच्या अलर्टनंतर शेतकरी पुन्हा आशेने पुढे येत आहेत. सरकारकडून तत्काळ मदत, बियाण्यांचा पुरवठा आणि किड नियंत्रण उपाययोजना हाच पुढचा मार्ग आहे.