Join us

Marathwada Sowing : शेतकऱ्यांच्या कष्टांना पाणी नाही; दुबार पेरणीचा धोका? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:48 IST

Marathwada Sowing : जून महिना संपत आला तरीही पुरेसा पाऊस न झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पीक कोमेजू लागले आहे. १०-१६ टक्केच पावसाची नोंद, जमिनीत ओल नाही आणि कोट्यवधी रुपयांचे बियाणं, खते वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे. अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीचं सावट गडद होत आहे.(Marathwada Sowing)

Marathwada Sowing : जून महिना संपत आला तरीही पुरेसा पाऊस न झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पीक कोमेजू लागले आहे. १०-१६ टक्केच पावसाची नोंद, जमिनीत ओल नाही आणि कोट्यवधी रुपयांचे बियाणं, खते वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे. (Marathwada Sowing)

अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीचं सावट गडद होत आहे.मराठवाड्यात यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी भीतीची घंटा ठरत आहे. जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने हजारो हेक्टरवरील पिकं कोमेजत आहेत. (Marathwada Sowing)

काही जिल्ह्यांमध्ये फक्त १० ते १६ टक्केच पावसाची नोंद झाल्याने जमिनीतील ओलसरपणा कमी झाला असून दुबार पेरणीचं संकट घोंगावत आहे. कोट्यवधी रुपयांचे बियाणे, खते आणि मेहनत वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.(Marathwada Sowing)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६% पाऊस, मात्र ५०% पेरण्या पूर्ण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ जून ते २४ जून दरम्यान १२५ मिमी सरासरीच्या तुलनेत फक्त ९१ मिमी (१६%) पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कृषी विभागाच्या माहितीप्रमाणे ५०% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मातीतील ओल गेलेली असल्याने याही भागात दुबार पेरणीची शक्यता अधिक आहे.

हिंगोलीत केवळ ८% पावसाची नोंद; पीक संकटात

हिंगोली जिल्ह्यात केवळ ६४.०४ मिमी पावसाची नोंद (८.१०%) झाल्याचे समोर आले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीच्या पावसावर आधारित ८० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, तूर, कापूस यासारख्या पिकं सुकू लागली आहेत, व शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा मोठा फटका बसू शकतो.

नांदेड जिल्ह्यात कोट्यवधींचं बियाणं आणि खत वाया जाण्याचा धोका

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ६३.२४% पेरणी झाली असून, पावसाने उघडीप दिल्याने पेरलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी स्प्रिंकलर, मोटारी, आणि हातपंपाच्या साहाय्याने शेवटचा प्रयत्न करत आहेत. चार दिवसांत पाऊस न पडल्यास दुबार पेरणी अटळ असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जालना जिल्ह्यात फक्त ७४ मिमी पाऊस; ६६% क्षेत्रावर पेरण्या

जालना जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १०६ मिमीच्या तुलनेत केवळ ७७ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे जिल्ह्यातील ६६% क्षेत्रावरच पेरणी झाली असून, उर्वरित शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. मे महिन्यात अवकाळी पावसाने दिलेली ओल देखील आता पूर्णपणे निघून गेल्याने पीक संकटात आहेत.

मराठवाड्यातील पावसाची सरासरी टक्केवारी (१ जून ते २४ जून २०२५)

जिल्हासरासरी पावसाचे प्रमाण (%)
छत्रपती संभाजीनगर१६%
हिंगोली८.१०%
नांदेड१२%
जालना१२%
बीड९.५%
परभणीअंदाजे १० ते १२%
उस्मानाबाद१३%
लातूरअंदाजे ११ ते १४%

शेतकरी म्हणतात, पहिल्या पेरणीत लाखोंचा खर्च केला, आता पाऊस नाही. जर पिकं उगवली नाहीत, तर परत बियाणं आणून पेरणी करावी लागेल. एवढी आर्थिक ताकद उरलेली नाही.

सरकार आणि प्रशासनाने काय करायला हवं?

कृषी विभागाकडून दुबार पेरणीसाठी त्वरित बियाणे आणि खते उपलब्ध करून देणं

सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत यादी तयार करणं

पाणी साठवण प्रकल्प, स्प्रिंकलर स्कीम, पीकविमा योजनेत लवकर निर्णय घेणं

पाऊस पडेलच, ही एकमेव आशा घेऊन मराठवाड्यातील बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलाय.. पण वेळेत कृती झाली नाही, तर या कोरड्या जमिनीवर बियाण्यांऐवजी आशाही अंकुरणार नाही.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Rain Alert : पावसाचा जोरदार कमबॅक! राज्यात १२ जिल्ह्यांना अलर्ट; तुमचा जिल्हा यात आहे का? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमराठवाडाशेतीपाऊसहवामान अंदाजखरीपखते