Lokmat Agro >हवामान > Manjara Dam Update : मांजरा धरणाचे ४ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Manjara Dam Update : मांजरा धरणाचे ४ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

latest news Manjara Dam Update: 4 gates of Manjara Dam opened; Alert issued to villages along the river | Manjara Dam Update : मांजरा धरणाचे ४ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Manjara Dam Update : मांजरा धरणाचे ४ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Manjara Dam Update : लातूर जिल्ह्यात सलग पावसामुळे मांजरा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मंगळवारी रात्री १० वाजता धरणाचे ४ दरवाजे उघडले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Manjara Dam Update)

Manjara Dam Update : लातूर जिल्ह्यात सलग पावसामुळे मांजरा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मंगळवारी रात्री १० वाजता धरणाचे ४ दरवाजे उघडले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Manjara Dam Update)

शेअर :

Join us
Join usNext

Manjara Dam Update : लातूर जिल्ह्यात सलग पावसामुळे मांजरा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मंगळवारी रात्री १० वाजता धरणाचे ४ दरवाजे उघडले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Manjara Dam Update)

तावरजा धरणातूनही विसर्ग वाढणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Manjara Dam Update)

मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात सलग होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील जलपातळी झपाट्याने वाढली आहे. पाण्याचा साठा सुरक्षित मर्यादेत ठेवण्यासाठी आणि धरणाची संरचना अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने मंगळवारी रात्री १० वाजता मांजरा धरणाचे चार दरवाजे (क्रमांक १, ३, ४ आणि ६) प्रत्येकी ०.२५ मीटरने उघडले.(Manjara Dam Update)

सध्याची स्थिती

धरणातून १३ हजार १६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

त्यापैकी २ दरवाजे ०.५० मीटरने, तर ४ दरवाजे ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहेत.

धरणात अजूनही पाण्याची आवक सुरू असल्यामुळे परिस्थितीनुसार विसर्गात वाढ किंवा कपात केली जाऊ शकते, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.

नागरिकांसाठी इशारा

जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कोणीही नदीपात्रात उतरू नये किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये.

पूराचा धोका असलेल्या भागांतील रहिवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

पाण्याची पातळी वाढल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी हलावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

तावरजा धरणातूनही विसर्ग वाढणार

जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्प धरणात देखील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रात्री ९ वाजता धरणाचे आठही दरवाजे उघडण्यात येणार आहेत.

प्रारंभी २ हजार ७२ क्युसेक (५८.६८ क्युमेक) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जाईल.

पाण्याची पातळी लक्षात घेऊन विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मांजरा आणि तावरजा धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Update : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन गेट्स उघडले; जाणून घ्या सविस्तर

Web Title: latest news Manjara Dam Update: 4 gates of Manjara Dam opened; Alert issued to villages along the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.