Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Dam Water Storage : यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई टळणार? जाणून घ्या राज्यात किती पाणीसाठा उपलब्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:34 IST

Maharashtra Dam Water Storage : फेब्रुवारीतच तापमान वाढू लागल्याने पाणीटंचाईची चिंता डोकावू लागली असतानाच राज्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील धरणांमध्ये ७१.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी अधिक साठा असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके कमी बसणार का? जाणून घ्या सविस्तर परिस्थिती…(Maharashtra Dam Water Storage)

Maharashtra Dam Water Storage : फेब्रुवारी महिना अर्ध्यावर येताच राज्यात तापमान वाढू लागले आहे.उन्हाळ्याची चाहूल लागताच पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. (Maharashtra Dam Water Storage)

अशा परिस्थितीत जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, राज्यातील धरणसाठा समाधानकारक असल्याचे चित्र समोर आले आहे.(Maharashtra Dam Water Storage)

राज्यातील एकूण २,९९७ धरणांमध्ये सध्या ७१.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत हा साठा ६३.८९ टक्के इतका होता. म्हणजेच यंदा तब्बल ७ टक्क्यांनी अधिक पाणी साठवले गेले आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता तुलनेने कमी जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Maharashtra Dam Water Storage)

विभागनिहाय जलसाठा स्थिती

राज्यातील विविध विभागांमध्ये जलसाठ्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

नाशिक विभाग – ७३.९४ %

अमरावती विभाग – ७३.५६ %

छत्रपती संभाजीनगर विभाग – ७३.३८ %

पुणे विभाग – ७०.२२ %

नागपूर विभाग – ७०.१३ %

कोकण विभाग – ६५.५० %

नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात साठा ७३ टक्क्यांपेक्षा अधिक असून ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

मात्र, कोकण विभागात तुलनेने कमी म्हणजे ६५.५० टक्के साठा असल्याने त्या भागात नियोजनबद्ध पाणी वापराची गरज अधोरेखित होत आहे.

साठ्याची एकूण क्षमता आणि शिल्लक पाणी

राज्यातील धरणांची एकूण उपयुक्त साठा क्षमता ४०,५३५.८४ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) इतकी आहे. सध्या प्रत्यक्षात २८,८६१.९८ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढतो. परिणामी उपलब्ध पाण्यात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि औद्योगिक वापर यामध्ये संतुलन राखणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

पाणी नियोजनाचे आव्हान

जरी साठा समाधानकारक असला तरी उन्हाळ्याचे तीन ते चार महिने अजून बाकी आहेत. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, टँकर व्यवस्थापन, शेतीसाठी नियोजित पाणी वाटप आणि जलसंवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे.

सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील पाणीसाठा दिलासादायक असला तरी काटेकोर नियोजन आणि जबाबदारीने वापर केल्यासच उन्हाळा सुरळीत पार पडू शकतो, असे जलतज्ज्ञांचे मत आहे.

हे ही वाचा सविस्तर :Rala Crop Farming : खडकाळ जमिनीत लाखोंचा नफा; राळा ठरतोय शेतकऱ्यांचा ‘स्मार्ट’ पर्याय

अधिक वाचा :Melghat Coffee Story : महाराष्ट्रात १५० वर्षांची कॉफी परंपरा; मेळघाटात दरवळतो 'अरेबिका'चा सुगंध

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Dams: Ample water storage hints at easing summer water scarcity.

Web Summary : Maharashtra's dams currently hold 71.20% water capacity, significantly higher than last year's 63.89%. While Nashik, Amravati, and Chhatrapati Sambhajinagar divisions have over 73% storage, Konkan needs careful water management. Effective planning is crucial for managing drinking water, irrigation, and industrial needs during the upcoming summer months to avoid water scarcity.
टॅग्स :शेती क्षेत्रपाणीपाणी कपातमहाराष्ट्रधरण