Maharashtra Dam : अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणांतील विसर्ग थांबविण्यात आला आहे. शिवाय धरणांतील पाणीसाठा स्थिर असल्याचे चित्र आहे. आज १२ ऑगस्टपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांसह इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे, याबाबत सविस्तर माहिती घेऊयात...
आज १२ ऑगस्टपर्यंत राज्यातील महत्वाच्या धरणांपैकी गंगापूर धरण (Gangapur Dam) ८२.३४ टक्के, जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) ९२.०५ टक्के, अलमट्टी धरण ९८.९३ टक्के, उजनी धरण १००.८१ टक्के, कोयना धरण ८३.६१ टक्के, भंडारदरा धरण ८८.७८ टक्क्यांवर आहे.
इतर धरणांचा पाणीसाठा पाहिला तर निळवंडे धरण ८८.५६ टक्के, निळवंडे धरण ९०.०८ टक्के, आढळा धरण १०० टक्के, माणिक डोह धरण ४३.१० टक्के, सीना आणि विसापूर धरण १०० टक्के भरले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील दारणा धरण ८३.४४ टक्के, कडवा धरण ८६.९७ टक्के, पालखेड धरण ५९.२६ टक्के, करंजवण धरण ८७.४० टक्के, गिरणा धरण ६३.९९ टक्के, हतनूर धरण २८.१६ टक्के, उकई धरण ६७.४७ टक्के, पांझरा धरण १०० टक्के भरले आहे.
तसेच कोकण, पुणे विभागातील मोडक सागर धरण ९७.१८ टक्के, तानसा धरण ९७.९२ टक्के, विहार धरण ७५.२४ टक्के, तुलसी धरण ८५.२६ टक्के, हेटवणे धरण ८८.८८ टक्के, चासकमान धरण ९६.७४ टक्के, पानशेत धरण ९०.४२ टक्के, खडकवासला धरण ४९.९७ टक्के, मुळशी धरण ८४.०२ टक्के, राधानगरी धरण ९२.७५ टक्के, सिद्धेश्वर धरण ७९.२७ टक्के, काटेपूर्णा धरण ६३.३६ टक्के अशी एकूण धरणांची स्थिती आहे.
- इंजि. हरिश्चंद्र र. चकोर, जलसंपदा (से.नि) संगमनेर.)