Maharashtra Dam Storage : गेल्या अनेक दिवसांपासून सर्व दूर पाऊस असून अनेक जिल्ह्यातील धरणांचा साठा समाधानकारक झाला आहे. आज 30 जून रोजी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात...
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) ५९.०९ टक्के एकूण जलसाठा आहे. तर उजनी धरणात एकूण ८७.१५ टक्के जलसाठा असून उपयुक्त जलसाठा हा ७१.९० टक्के आहे. कोयना धरणात एकूण जलसाठा ४८.६४ टक्के तर ४६.०१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
तसेच नाशिक विभागातील गंगापूर धरणात (Gangapur Dam) ५६.८७ टक्के, दारणा धरणात ५२.४८ टक्के तर गिरणा धरणात ३३.३२ टक्के, हतनुर धरणात २८.१६ टक्के जलसाठा जमा झाला आहे.
तर मुंबई विभागातील धरणांची स्थिती पाहिली असता मोडक सागर धरणात ५३.४८ टक्के, तानसा धरणात ४३.५३ टक्के तर भातसा धरणात ४९.८३ टक्के जलसाठा आहे. पुणे विभागातील चासकमान धरणात ४७.११ टक्के, पानशेत धरणात ४५.९५ टक्के, खडकवासला धरणात ६१.५१ टक्के, मुळशी धरणात ५५.७६ टक्के तर वीर धरणात ७३.०७ टक्के जलसाठा जमा झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात ५५.९० टक्के, निळवंडे धरणात ४७.७२ टक्के, सीना धरण १०० टक्के भरले असून विसापूर धरणास ९२.६२ जलसाठा जमा झाला आहे.
कोणत्या धरणातून किती विसर्ग?
राज्यातील धरणांचा विसर्ग पाहिला असता राजापूर बंधाऱ्यातून ६५ हजार २५० क्युसेकने होत आहे. त्यानंतर उजनी धरणातून १६ हजार ६०० क्युसेक, दौंड धरणातून ११ हजार ५८७ क्युसेक, वीर धरणातून ३७८५ क्युसेक, त्यानंतर खडकवासला धरणातून १०२६ क्युसेक, तर गंगापूर धरणातून १३६० क्युसेक, नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीत ८५८० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.