Join us

Dam Water Storage : मान्सूनचा ब्रेक…अमरावती विभागाच्या धरणांमध्ये 'इतके' टक्के जलसाठा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:55 IST

Dam Water Storage : अमरावती जिल्ह्यात धरणांतील जलपातळी झपाट्याने खाली घसरत आहे. सध्या केवळ ४० टक्के जलसाठा शिल्लक असून, मान्सूनची वाट पाहत पाण्याचा प्रत्येक थेंब मोजत प्रशासन उभे आहे. पावसाची तुट कायम राहिली, तर आगामी काळात पाणीपुरवठा, शेती व उद्योग या तिन्ही आघाड्यांवर संकट गडद होण्याची शक्यता आहे. (Dam Water Storage)

Dam Water Storage : अमरावती जिल्ह्यात धरणांतील जलपातळी झपाट्याने खाली घसरत आहे. सध्या केवळ ४० टक्के जलसाठा शिल्लक असून, मान्सूनची वाट पाहत पाण्याचा प्रत्येक थेंब मोजत प्रशासन उभे आहे.(Dam Water Storage)

पावसाची तुट कायम राहिली, तर आगामी काळात पाणीपुरवठा, शेती व उद्योग या तिन्ही आघाड्यांवर संकट गडद होण्याची शक्यता आहे.यंदाच्या मान्सूनने जून महिन्याच्या प्रारंभीच खंड दिल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये जलपातळी धोक्याच्या पातळीवर पोहचली आहे. (Dam Water Storage)

सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ४० टक्के जलसाठा शिल्लक असून, तोही झपाट्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी दिवसांत दमदार पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.(Dam Water Storage)

धरणांमध्ये किती पाणीसाठा?

जिल्ह्यात अप्पर वर्धा हा मुख्य मोठा धरण प्रकल्प असून, त्याच्यासह ७ मध्यम व ४८ लघु प्रकल्प कार्यरत आहेत.

एकूण जलसंचय क्षमता १,०४७ दलघमी असून, सद्यस्थितीत केवळ ४२२ दलघमी पाणी शिल्लक आहे.

धरणाचे नावसध्याचा साठा (दलघमी)
अप्पर वर्धा२४३
शहानूर१८.०९
चंद्रभागा२४.८७
पूर्णा३५.३७
सपन२७.९०
पंढरी११.५७
गर्गा००.००
बोर्डी नाला१.७०
४८ लघु प्रकल्प७६.०४
एकूण साठा४२२

धरणांची धोकादायक स्थिती!

२७ लघुप्रकल्प पूर्णपणे कोरडे, काहींनी तर तळ गाठला आहे.

पाणलोट क्षेत्रांमध्ये केवळ ६३ मिमी पाऊस, जे सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.

जलसाठ्यातील घट आणि नागरिकांकडून वाढणारी मागणी यामुळे पाणीपुरवठ्यावर ताण वाढतोय.

अप्पर वर्धा धरणावर अमरावती शहर, ग्रामीण भाग व औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

शेतीसाठी धोका!

जर लवकर पाऊस बरसला नाही, तर खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक पाणी धरणांतून सोडण्याची वेळ येऊ शकते. परिणामी, जलसाठा आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यातील इतर भागांत जरी पावसाची स्थिती समाधानकारक असली तरी अमरावती जिल्ह्यातील धरणांची स्थिती गंभीर आहे. यामुळे प्रशासनाने जलसाठ्याचे योग्य नियोजन व पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Imbalance : मान्सूनचा कहर! राज्यात अतिवृष्टी आणि दुष्काळ एकाचवेळी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणविदर्भपाणीपाणीकपातअमरावतीमोसमी पाऊस