Join us

Dam Water Level Maharashtra : सप्टेंबरच्या पावसाने लघु प्रकल्प तुडुंब; रब्बी हंगामाला येणार गती वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 15:56 IST

Dam Water Level Maharashtra : गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील २५९९ लघु प्रकल्पांमध्ये जलसाठा तब्बल ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक साठा झाल्याने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या गरजाही पूर्ण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. (Dam Water Level Maharashtra)

Dam Water Level Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील लघु प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. (Dam Water Level Maharashtra)

राज्यातील एकूण २५९९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी साठा आता ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच काळात हा साठा फक्त ५१.७७ टक्क्यांवर होता. त्यामुळे यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Dam Water Level Maharashtra)

सप्टेंबरमध्ये दिलासा

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक प्रकल्प कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा झपाट्याने वाढला. या साठ्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या गरजाही पूर्ण होणार आहेत.

विभागनिहाय साठा (टक्केवारीत)

नागपूर विभाग : ७८.९३% (गतवर्षी ७२.७६%)

अमरावती विभाग : ६९.३२% (गतवर्षी ६९.८७%)

छ. संभाजीनगर विभाग : ६८.५१% (गतवर्षी ३९.९४%)

नाशिक विभाग : ५८.२७% (गतवर्षी ४४.५१%)

पुणे विभाग : ५३.७०% (गतवर्षी ४२.८९%)

कोकण विभाग : ८०.५९% (गतवर्षी ८०.४४%)

संभाजीनगर व नाशिकमध्ये सर्वाधिक वाढ

आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभागांमध्ये साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तर कोकण आणि नागपूर विभाग जलसाठ्याच्या बाबतीत अव्वल ठरले आहेत.

रब्बी हंगामासाठी महत्त्वाचे पाणी

या साठ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाणी नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे.

या पावसामुळे लघु प्रकल्प भरले. आता रब्बीसाठी पाणी मिळेल याची खात्री वाटते. मात्र सरकारने पाणी नियोजन काटेकोर केले पाहिजे.

हे ही वाचा सविस्तर : Dairy Farming Crisis : दुग्धव्यवसायावर अतिवृष्टीने 'पाणी'; चारा टंचाई, दूध संकलनात ३०% घट वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's Minor Irrigation Projects See 65% Water Storage, Providing Relief

Web Summary : Maharashtra's minor irrigation projects now hold 65% water, up from last year's 51.77%, due to recent rains. This offers significant relief to farmers for the upcoming Rabi season, addressing both drinking water and irrigation concerns. Rabi crop water management is advised.
टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसधरणपाणीशेतकरीशेती