भातशेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. खरीपभाताची लागवड करताना प्रथम रोपवाटिकेमध्ये भाताची रोपे तयार करतात आणि नंतर भात खाचरामध्ये रोपांची लागवड केली जाते. भाताचे भरघोस उत्पन्न येण्यासाठी भाताची रोपे निरोगी आणि जोमदार असणे आवश्यक आहे.
भात रोपवाटिकेसाठी जमिनीची निवडभात रोपवाटिकेसाठी जमीन निवडताना खालील बाबींचा विचार करावा.१) रोपवाटिकेसाठी निवडलेली जागा पाण्याचा निचरा करता येणारी असावी.२) जमिनीची सुपिकता चांगली असावी, त्यामुळे रोपे जोमदार वाढतात.३) रोपवाटिका अति सखल भागात नसावी. कारण सतत पाऊस पडल्यास पाण्याचा निचरा करता येत नाही.४) पावसाचा खंड पडल्यास पाणी देण्याची व्यवस्था असावी.५) रोपवाटिकेचे भटक्या तसेच रानटी प्राण्यांपासून संरक्षण करता यावे.
गादीवाफे पद्धतीने रोपे तयार करणे◼️ जमीन उभी आडवी नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी.◼️ धसकटे काडीकचरा वेचून घ्यावा.◼️ त्यानंतर तळाशी १२० सें.मी. पृष्ठभागी ९० सें.मी. रुंदीचे व १० ते १५ से.मी. उंचीचे आणि सुमारे ६ मीटर लांबीचे गादीवाफे तयार करावेत.◼️ वाफ्यांची लांबी भात खाचरानुसार कमी अधिक असली तरी चालेल.◼️ वाफे तयार करताना जमिनीत चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट खत प्रति आर क्षेत्रास ५०० किलो या प्रमाणात एकत्र करून घ्यावे.◼️ एक हेक्टर क्षेत्रास पुरेशी रोपे मिळण्यासाठी ०.१० हेक्टर (१० आर) क्षेत्रात रापेवाटिका तयार करावी.◼️ वाफ्यात प्रति आर क्षेत्रास १ किलो युरीया व ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. उत्तम रूजव्यांसाठी प्रमाणित बियाणे वापरावे.◼️ तयार वाफ्यांवर रूंदी समांतर ७ ते ८ से.मी. अंतरावर ओळीमध्ये १ ते २ सें. मी खोलीवर बियाणे पेरून ते योग्य प्रकारे झाकून घ्यावे.◼️ जाड दाण्यांच्या जातीकरिता प्रति हेक्टरी ५० किलो तसेच वारीक दाण्यांच्या जातींचे प्रति हेक्टरी ४० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.◼️ बी उगवण्याच्या वेळेस जमिनीतील पाण्याचा निचरा करावा. पेरणीनंतर लगेच वाफ्यांमध्ये जास्त पाणी साचू देऊ नये.◼️ जमिनीत साधारण ओलावा राहील एवढेच पाणी असावे. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते.◼️ पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति आर क्षेत्रास १ किलो युरीया खताचा दुसरा हप्ता द्यावा.◼️ खरीप हंगामात भात जातीपरत्वे सुमारे २१ ते २४ दिवसांत रोपे लावणीसाठी तयार होतात.
अधिक वाचा: कांद्याला चांगला दर मिळण्यासाठी हंगामानुसार कसे कराल कांदा लागवड नियोजन?