Agriculture News : तांदूळ आणि डाळ (Paddy Or Pulses) हे आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हे दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी शिजवायला सोपे आहेत, परंतु ते योग्यरित्या साठवणे आव्हानात्मक असू शकते. जर ते योग्यरित्या साठवले गेले नाहीत तर त्यांना कीटकांचा प्रादुर्भाव (Tips to Prevent Insects in Grains) होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे त्यांना फेकून द्यावे लागू शकते. पण थोडी काळजी घेतली तर या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो.
तांदूळ आणि डाळींना कीटकांपासून (Pest) वाचवणे कठीण नाही, फक्त थोडी सावधगिरी आणि योग्य पद्धत अवलंबण्याची आवश्यकता आहे. कडुलिंबाची पाने, काळी मिरी आणि तमालपत्र यांसारखे उपाय केवळ सोपे आहेतच, शिवाय धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी देखील प्रभावी उपाय म्ह्णून काम करतात. भात आणि डाळींचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी उपायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
वाळलेल्या कडुलिंबाची पाने
भात आणि डाळींना कीटकांपासून वाचवण्यासाठी सुक्या कडुलिंबाच्या पानांचा वापर खूप फायदेशीर आहे. जेव्हा तुम्ही ते साठवता तेव्हा वाळलेल्या कडुलिंबाची पाने डब्यात ठेवा. कडुलिंबाच्या पानांमधून येणारा तीव्र वास कीटकांना दूर ठेवतो. पाने पूर्णपणे कोरडी आणि स्वच्छ असल्याची खात्री करा.
काळी मिरीचा वापर
तांदूळ आणि डाळ साठवताना काळी मिरी देखील वापरली जाऊ शकते. एका छोट्या कापडात काळी मिरी बांधा आणि ती तांदूळ किंवा डाळीच्या भांड्यात ठेवा. यामुळे कीटक जवळ येण्यापासून रोखले जातील आणि तुमचे धान्य सुरक्षित राहील.
तमालपत्राचे फायदे
तमालपत्र केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच उपयुक्त नाही तर ते तांदूळ आणि डाळींना कीटकांपासून वाचवण्यास देखील मदत करते. डब्यात तमालपत्र ठेवल्याने कीटक हळूहळू पळून जाऊ लागतात. हा उपाय सोपा आणि प्रभावी आहे.
इतर उपाय
- हवाबंद डब्यांचा वापर करा : तांदूळ आणि डाळ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा.
- उन्हात वाळवणे : साठवण्यापूर्वी तांदूळ आणि डाळ उन्हात चांगले वाळवा.
- कमी प्रमाणात साठवा : तांदूळ आणि डाळ कमी प्रमाणात साठवण्याचा प्रयत्न करा.