Agriculture News : अनेकदा धान्य काढणी किंवा मळणीसाठी लाखो रुपये किमतीचे मोठे ट्रॅक्टर आणि कंबाईन हार्वेस्टरचा वापर केला जातो. मात्र अनेक शेतकरी हे 'अल्पभूधारक' असून, ज्यांच्याकडे खूपच कमी जमीन आहे. अशा शेतकऱ्यांना अवजड यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. यावर उपाय म्हणून एक स्वस्तातील जुगाडू मळणी यंत्र तयार करण्यात आले आहे.
छोटया शेतकऱ्यांसाठी किफायतीशीर असलेले हे जुगाडू यंत्र आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील गोपेन राय यांनी तयार केले आहे. ज्या शेतकऱ्यांना धान्य साफ करण्यासाठी तासंतास कष्ट करावे लागतात, त्यांच्यासाठी लाकडी उफणणी यंत्र (मळणी, चाळणी) एक वरदान ठरत आहे.
या सुधारित यंत्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
शेतकरी धान्याने टोपल्या भरतात, वाऱ्याची वाट पाहतात आणि नंतर त्या उंचीवरून खाली टाकतात. सर्वात मोठी समस्या ही आहे की, जर वारा नसला तर काम थांबते.
पावसाळ्यात किंवा डोंगराळ भागात, जिथे वाऱ्याची खात्री नसते, तिथे शेतकरी विशेषतः हतबल होतात. शिवाय, तासंतास शारीरिक श्रम करणे अत्यंत थकवणारे असू शकते आणि उडणारी धूळ फुफ्फुसात जाऊन श्वसनाच्या समस्या निर्माण करू शकते.
गोपेन राय यांनी ही समस्या प्रत्यक्ष अनुभवली आणि तिरकस फलाटांसह एक लाकडी चौकट तयार केली. विजेच्या स्टँड फॅनसोबत वापरल्यास, ते कृत्रिम वारा निर्माण करून धान्य आणि कोंडा झटपट वेगळे करते. असे हे जुगाड काम करते.
कमी खर्चात प्रभावी परिणाम
बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टरचलित यंत्रांची किंमत हजारो किंवा लाखो रुपये असताना, गोपेनची लाकडी रचना असलेली चाळणी यंत्र केवळ ३,५०० रुपयांमध्ये तयार होते. पारंपरिक पद्धतीने ६.५ क्विंटल धान्य साफ करण्यासाठी किमान ३ ते ४ माणसांना कठोर परिश्रम करावे लागतात. परंतु या छोट्या यंत्रामुळे, एकच व्यक्ती तेच काम फक्त एका तासात पूर्ण करू शकते. याचा अर्थ, यामुळे केवळ वेळेचीच बचत होत नाही, तर मजुरीच्या खर्चाचीही बचत होते. वापरलेले लाकूड आणि साहित्य स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असल्यामुळे, त्याची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करणे खूप सोपे जाते.
Read More : विना सातबारा सौर कृषी पंपाचा लाभ मिळतो का, काय आहे नेमका निकष, वाचा सविस्तर
