Join us

BBF Technique : 'बीबीएफ' तंत्र आधुनिक शेतकऱ्यांची पेरणीची यशस्वी गुरुकिल्ली! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:47 IST

BBF Technique : पाऊस कधी पडेल, कधी थांबेल याचा नेम नाही. हवामान बदललंय, मात्र, आपल्या शेतीचा भरवसा कायम ठेवायचा असेल, तर पेरणीची पद्धतही बदलावी लागेल. वाचा सविस्तर (BBF Technique)

BBF Technique : पाऊस कधी पडेल, कधी थांबेल याचा नेम नाही. हवामान बदललंय, मात्र, आपल्या शेतीचा भरवसा कायम ठेवायचा असेल, तर पेरणीची पद्धतही बदलावी लागेल.(BBF Technique)

पारंपरिक पद्धती आता मागे पडत आहेत आणि आधुनिक, हवामान-तरोताजा शेतीत बीबीएफ म्हणजेच रुंद वरंबा व सरी पद्धतीने पेरणी ही शेतकऱ्यांची नवी दिशा ठरते आहे.(BBF Technique)

पाणी साचत नाही, खतांचा योग्य वापर होतो, उत्पादनात वाढ होते आणि जमिनीचा पोतही सुधारतो. अशा बहुपयोगी बीबीएफ तंत्रामुळे शेतकरी यशस्वी होतोय.(BBF Technique)

शेतीतील यशाची गुरुकिल्ली

परिस्थिती बदलते आहे, हवामानही अनिश्चित झाले आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी शेतीसाठी योग्य पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे ठरते. 'बीबीएफ' म्हणजेच रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने पेरणी ही अशीच एक आधुनिक व शाश्वत शेतीची दिशा दाखवणारी पद्धत आहे.

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आता पारंपरिक पद्धतीऐवजी बीबीएफचा वापर करत असून, उच्च उत्पादन व खर्चात बचत याचा अनुभव घेत आहेत.

बीबीएफ पद्धती म्हणजे काय?

* बीबीएफ म्हणजे रुंद वरंबा आणि सरी अशा पद्धतीने शेतात पेरणी करणे.

* या पद्धतीत: ४५ ते ६० सें.मी. अंतरावर रुंद वरंबा तयार केला जातो.

* बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने बी, खत आणि आंतर मशागत एका वेळी केली जाते.

* वरंब्यांमधून पावसाचे पाणी निचरा होते, आणि मुळांना हवा मिळते.

या पद्धतीने शेतकऱ्यांना होणारे फायदे

* २०-२५% पर्यंत उत्पादनात वाढ

* पावसाचे पाणी साचत नाही, बियाण्यांची कुज टळते

* मुळांना हवा मिळते, जमिनीचा पोत सुधारतो

* कीड, तण आणि रोग नियंत्रण सुलभ

* खते योग्य प्रकारे मुरतात, कार्यक्षमता वाढते

* मशागत, फवारणी व आंतर मशागत सुलभ होते

* वेळ, मजुरी आणि खर्चात बचत

* बियाण्याच्या खर्चात बचत

* शेतातील ओलावा टिकतो, त्यामुळे दुष्काळातही फायदा

कशासाठी योग्य?

बीबीएफ पद्धती सोयाबीन, कापूस, मका, हरभरा, ज्वारी, बाजरी अशा अनेक पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

शेतकऱ्यांनो, आजच बीबीएफचा स्वीकार करा!

शेती टिकवण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी बीबीएफ पद्धत ही काळाची गरज आहे. 'जमिनीचे आरोग्य, शेतकऱ्याचे समाधान' हाच या तंत्रज्ञानाचे उद्देश आहे.

हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : सोयाबीन, ज्वारी, बाजरी पेरणीसाठी उपयुक्त माहिती इथे वाचा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपेरणीमहाराष्ट्रहवामान अंदाजपाऊससोयाबीनकापूस