Lokmat Agro >स्मार्ट शेती > Amarvel : अमरवेलचा विळखा : पिकांची हानी, नियंत्रणासाठी 'या' करा उपायायोजना

Amarvel : अमरवेलचा विळखा : पिकांची हानी, नियंत्रणासाठी 'या' करा उपायायोजना

latest news Amarvel: Amarvel's blight: Crop damage, 'come' to plan measures for control | Amarvel : अमरवेलचा विळखा : पिकांची हानी, नियंत्रणासाठी 'या' करा उपायायोजना

Amarvel : अमरवेलचा विळखा : पिकांची हानी, नियंत्रणासाठी 'या' करा उपायायोजना

Amarvel : खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. त्यात पिकांवर होणाऱ्या अमरवेलचा हल्ला रोखण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊयात सविस्तर

Amarvel : खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. त्यात पिकांवर होणाऱ्या अमरवेलचा हल्ला रोखण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊयात सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Amarvel : खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. त्यात पिकांवर होणाऱ्या अमरवेलचा हल्ला रोखण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊयात सविस्तर 

पिकांवर विळखा घालणारा, अन्नरस शोषणारा आणि वर्षानुवर्षे जमिनीत दबा धरून बसणारा हा 'अमरवेल' नावाचा परोपजीवी तण शेतकऱ्यांसाठी मोठं संकट ठरत आहे. (Amarvel)

सोयाबीन, हरभरा, मूग, कपाशीसारख्या पिकांची वाढ खुंटवणारा हा गुप्त हल्लेखोर आता नियंत्रणाबाहेर जाण्याच्या वाटेवर आहे. या संकटावर मात करण्यासाठी सामूहिक कृती हाच एकमेव पर्याय आहे.(Amarvel)

अमरवेल म्हणजे काय?

अमरवेल ही एक पूर्ण परोपजिवी, पर्णहीन व पिवळसर नारिंगी रंगाची वेलसर तणवनस्पती आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या सुमारे १७० प्रजाती आहेत, व ती स्वतःच्या उपजीविकेसाठी द्विदल पिकांवर (Dicot crops) पूर्णतः अवलंबून असते.

मूळ नसलेली ही वनस्पती दुसऱ्या झाडाच्या खोडाभोवती गुंडाळते व त्यातून अन्नरस शोषून स्वतःचा विकास करते.(Amarvel)

पिकांवर अमरवेलचा धोका कसा वाढतो?

अमरवेल मुख्यतः सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, हरभरा, कांदा, मिरची, जवस अशा महत्त्वाच्या द्विदल पिकांवर आढळते. तिचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांचे नुकसान होते. (Amarvel)

*पीक मरते किंवा वाढ खुंटते.

* उत्पादनात मोठी घट होते.

* पिकांचा जीवनचक्रच बिघडतो.

* अमरवेलचे बी २० वर्षांहून अधिक काळ सुप्तावस्थेत जमिनीत टिकून राहू शकते, त्यामुळे ती अनेक हंगामांनंतरही पुन्हा सक्रिय होऊ शकते.

अमरवेलची वाढ कशी होते?

* बाल्यावस्थेत अमरवेल जमिनीवर असते व दुसऱ्या वनस्पतीला गुंडाळून तिच्यावर चिकटते.

* मूळ नसल्यामुळे ती झाडाच्या शरीरातील अन्नरस शोषून घेते.

* एक अमरवेल दिवसाला ७ सेंमी वाढते, व दररोज जवळपास ३ चौरस मीटर क्षेत्र व्यापू शकते.

अमरवेल नियंत्रणासाठी उपाय योजना

प्रतिबंधात्मक उपाय

* प्रमाणित व तणमुक्त बियाण्यांचा वापर करणे आवश्यक.

* पूर्णपणे कुजलेले शेणखत वापरणे.

* शेताच्या बांध, रस्त्याच्या कडा, शेणखताच्या ढिगावरची अमरवेल नष्ट करणे. गाडून किंवा जाळून टाकणे आवश्यक आहे. 

*  जमिनीची खोल नांगरणी करून सुप्त बियांची उगम क्षमता कमी करावी.

उगवणपूर्व तणनाशकांची शिफारस

पीकतणनाशकप्रमाण (प्रतिएकर)
सोयाबीनपेंडिमेथैलिन (38.7% C.S.)700 मि.ली.
सोयाबीनडिक्लोसुलम + पेंडिमेथैलिन (0.9%, 35% S.E.)1000 मि.ली.
कपाशीपेंडिमेथैलिन + इमाझेथापीर (30%, 2% E.C.)1200 मि.ली.
कपाशीपायरिथिओबॅक + पेंडिमेथैलिन (3.1%, 34% Z.C.)800 मि.ली.

तणनाशकांची फवारणी पीक उगवण्यापूर्वी (Pre-emergence) करावी व नेहमी कृषी अधिकाऱ्याच्या सल्ल्यानेच निवड करावी.

अमरवेल म्हणजे एक दीर्घकाळ धोक्याची घंटा!

यावर वेळेत उपाय न केल्यास शेतकऱ्याचे उत्पादन, वेळ आणि पैसा तिघांचाही अपव्यय होतो. त्यामुळेच या परोपजिवी तणाचा सामूहिक, तांत्रिक आणि प्रतिबंधात्मक उपायांनी बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

सामूहिक प्रयत्नांची गरज

अमरवेलचा पूर्ण नायनाट करायचा असेल, तर एकट्या शेतकऱ्याने न घेता संपूर्ण गाव, विभाग, गटशेतीच्या स्वरूपात याचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. कारण एका शेतातून दुसऱ्या शेतात वाऱ्यामुळे किंवा शेतमजुरांच्या वापरातून अमरवेल सहज पसरते.

 

हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : शेतकऱ्यांनो सावध! पेरणीपूर्व हवामान सल्ला वाचा सविस्तर

Web Title: latest news Amarvel: Amarvel's blight: Crop damage, 'come' to plan measures for control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.