Agriculture News : उन्हाळी पिकांसाठी पाण्याचे योग्य नियोजन आणि सिंचन व्यवस्थापन हे भरघोस उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने आणि तापमान वाढल्यामुळे पिकांना पाण्याची गरज सतत भासते.
- उष्ण हवामांचा अंदाज लक्ष्यात घेता उन्हाळी भाजीपाला व फळबागांना शक्यतो सायंकाळी ओलीत करावे, तसेच पिकामध्ये अच्छादनाचा वापर करावा.
- उन्हाळी पिकातील जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी शेतात गवताचे आच्छादन करावे व ठिबक सिंचनाचा अवलंब करावा.
- फळपिकांमध्ये शक्यतो खुरपणी करुन घ्यावी व बोर्डोपेस्ट खोडांना लावावे.
- पिकांना पाणी शक्यतो रात्री द्यावे व उन्हाळी पिके, भाजीपाला व फळबागांमध्ये सूक्ष्म सिंचनाचा (ठिबक व तुषार सिंचन) उपयोग करून पाण्याची बचत करावी. जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे जमिन चांगली तापुन त्यामधील जिवजंतुचा नाश होवुन खरीप पिकातील तणांचे प्रमाण, किड व रोगाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भाजीपाला व फळ झाडांमध्ये मल्चिंग करावी.
- भाजीपाला पिकाला आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देणे.
- फळ पिकांमध्ये फळे पोसण्यासाठी बोरॉन १.५ ग्राम, कॅल्शिअम ०.७५ ग्राम, मॅग्नेशीअम ३ ग्राम प्रती लिटर पाण्यातून फवारावे.
- साठवण करावयाच्या कडधान्यांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ३ ते ५ मि.ली. एरंडेल/जवस/करंज/कडुनिंबाचे तेल प्रति किलो धान्य या प्रमाणात वापरावे.
- उष्ण हवामानाचा अंदाज लक्ष्यात घेता तोडणीला आलेल्या भाजीपाला पिकांची त्वरित तोडणी करून घ्यावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
