Agriculture News : सद्यस्थितीत या आठवड्यात पावसाची शक्यता (Rain) वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस, वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता पिकांचे संरक्षण महत्वाचे आहे. त्यानुसार डाळिंब बागेतील (Dalimb Farm) जास्तीचे पाणी काढून टाकावे व जमिनीवर पडलेला काडीकचरा, पालापाचोळा व खराब / सडलेली फळे गोळाकरून नष्ट करून बागेला स्वच्छ ठेवावे, यासह कोणत्या उपाययोजना कराव्यात, हे जाणून घेऊयात....
अवकाळी पाऊसग्रस्त बागेचे व्यवस्थापन
- अवकाळी पाऊसग्रस्त बागेचे व्यवस्थापन फुलधारणा, फळधारणेस सुरुवात प्रादुर्भावित, इजा झालेल्या फुलकळ्या किंवा फळे काढून टाकावीत.
- शिफारशीप्रमाणे फवारणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
- अधिक फुल आणि फळधारणेसाठी थोडीशी वाट पहावी.
- समाधानकारक फुले व फळधारणा दिसल्यास शिफारशीप्रमाणे एकात्मिक रोग-कीड व्यवस्थापन करून बहर चालू ठेवावा.
- अन्यथा बाग विश्रांतीवर ठेवावी. पुढील पीक हंगामासाठी, बहराची तयारी करावी.
- सर्व फळांचे नुकसान, फांद्या तुटणे / चिरणे सर्व नुकसानग्रस्त फळे काढावीत.
- तुटलेल्या, चिरलेल्या फांद्या छाटून बागेबाहेर खड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात.
- छाटलेल्या फांद्या, खोडांवर बोर्डो पेस्ट लावावी.
- त्यानंतर १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
- खतांचा हलका डोस भरून बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे.
- पुढील बहराची तयारी करावी.
विश्रांती अवस्थेतील बाग
- विश्रांती अवस्थेतील बाग सर्व नुकसानग्रस्त, तुटलेल्या, चिरलेल्या फांद्या छाटाव्यात.
- बागेबाहेर खड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्यांना, खोडांवर बोर्डो पेस्ट लावावी.
- त्यानंतर १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
- विश्रांती अवस्थेत खत व्यवस्थापन केले नसल्यास खतांचा डोस देऊन घ्यावा.
- शिफारशीप्रमाणे विश्रांती अवस्थेतील एकात्मिक रोग- कीड व्यवस्थापन करावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी