Lokmat Agro >बाजारहाट > यंदा शेतमालाला बाजारात किमान आधारभूत किंमत ठरणार फायदेशीर

यंदा शेतमालाला बाजारात किमान आधारभूत किंमत ठरणार फायदेशीर

This year, the minimum support price for agricultural products in the market will be profitable. | यंदा शेतमालाला बाजारात किमान आधारभूत किंमत ठरणार फायदेशीर

यंदा शेतमालाला बाजारात किमान आधारभूत किंमत ठरणार फायदेशीर

Agriculture Market MSP : केंद्र सरकारने २०२५ साली खरीप व रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या असून, यामध्ये काही महत्त्वाच्या पिकांच्या दरामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट लाभशेतकऱ्यांना होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्याला मदत होणार आहे.

Agriculture Market MSP : केंद्र सरकारने २०२५ साली खरीप व रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या असून, यामध्ये काही महत्त्वाच्या पिकांच्या दरामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट लाभशेतकऱ्यांना होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्याला मदत होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्र सरकारने २०२५ साली खरीप व रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या असून, यामध्ये काही महत्त्वाच्या पिकांच्या दरामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट लाभशेतकऱ्यांना होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्याला मदत होणार आहे.

परभणी जिल्ह्याच्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीस प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार, खरीप हंगामातील अनेक पिकांच्या किमान आधारभूत किमती वाढवण्यात आल्या आहेत. साधारण ज्वारीसाठी ३२८ रुपयांनी वाढ होऊन नवीन किंमत ३६९९ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. मक्यात १५० रुपयांची वाढ होऊन २४०० रुपये, बाजरी १७५ रुपयांची वाढ होऊन २७७५ रुपये, तर नाचणीसाठी तब्बल ५९६ रुपयांची वाढ होऊन ४८८६ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

डाळींच्या पिकांतही चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. तूरसाठी ८००० रुपये, मूगसाठी ८७६८ रुपये आणि उडीदसाठी ७८०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आले आहेत. तेलबियांमध्ये तीळ ९८४६ रुपये (५७९ रुपयांनी वाढ), सोयाबीन ५३२८ रुपये (४३६ वाढ) आणि सूर्यफुल ७७२१ रुपये (४४१ वाढ) अशी दरवाढ जाहीर झाली आहे.

कापसाच्या किमतीतही ५८९ रुपयांची भर घालून ८११० रुपये प्रतिक्विंटल अशी नवी किंमत निश्चित करण्यात आली आहे. रब्बीतील गव्हासाठी २४२५ रुपये (१५० वाढ), हरभऱ्यासाठी ५६५० रुपये (२१० वाढ), मोहरीसाठी ५९५० रुपये (३०० वाढ) आणि करडीसाठी ५९४० रुपये (१४० वाढ) इतका दर ठरवण्यात आला आहे.

आधारभूत किंमतवाढीने वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न

आधारभूत किंमतवाढीने शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक व स्वागतार्ह असल्याचे बाजार समिती संचालक डॉ. संजय रोडगे म्हणाले.

हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा 

Web Title: This year, the minimum support price for agricultural products in the market will be profitable.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.