पुणे : बाजारात सीताफळाची आवक सुरु झाली आहे. सीताफळाला लिलावात उच्चांकी म्हणजे किलोला तब्बल ४४४ रुपये भाव मिळाला.
सातारा जिल्ह्यातील कनेर येथील शेतकरी सुनील डोळस यांच्या शेतातून सीताफळांचे व्यापारी युवराज काची यांच्या गाळ्यावर ही आवक सुरू झाली आहे.
सध्या बाजारात तुरळक म्हणजे दररोज ४० ते ५० किलो आवक होत आहे. जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे.
सीताफळाचे तीन बार असतात. त्यापैकी पहिल्या बारची ही आवक आहे. हळूहळू आवक वाढणार आहे. आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर नागरिक सीताफळांची वाट पाहत असतात.
हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यासह अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यातून आवक असते. सध्या सिताफळाला मागणी वाढली आहे.
अधिक वाचा: बनावट दस्त व कुलमुखत्यारपत्र नोंदणी कायदा बदलणार; काय होणार बदल? वाचा सविस्तर