Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नारळासह खोबऱ्याचे दर वाढले; गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ

नारळासह खोबऱ्याचे दर वाढले; गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ

Prices of coconuts and copra have increased; double the increase compared to last year | नारळासह खोबऱ्याचे दर वाढले; गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ

नारळासह खोबऱ्याचे दर वाढले; गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ

गणेश उत्सवापासूनच नारळासह खोबऱ्याचे दर वाढले आहे. २० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ आता तब्बल ४० ते ५० रुपयांना विकण्यात येत आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून या काळात मागणी वाढत असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात.

गणेश उत्सवापासूनच नारळासह खोबऱ्याचे दर वाढले आहे. २० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ आता तब्बल ४० ते ५० रुपयांना विकण्यात येत आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून या काळात मागणी वाढत असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात.

शेअर :

Join us
Join usNext

गणेश उत्सवापासूनच नारळासह खोबऱ्याचे दर वाढले आहे. २० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ आता तब्बल ४० ते ५० रुपयांना विकण्यात येत आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून या काळात मागणी वाढत असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात.  

राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५,३५४ हेक्टर क्षेत्रावर नारळ लागवड झाली असून, उत्पादनक्षम क्षेत्र ४,८७५ हेक्टर आहे. हेक्टरी फळांची उत्पादकता ११,२५० फळे इतकी आहे. जिल्ह्यातील हवामान फळबाग लागवडीसाठी पोषक असले तरी सर्वाधिक लागवड आंबा, काजू या पिकांची आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादित होणारा नारळ अपुरा पडत असल्याने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक येथून आवक करावी लागते. अन्य राज्यांतील नारळाची आवक घटल्यामुळे स्थानिक नारळाच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रक्रिया उद्योगावर भर

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक राज्यात नारळावरील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाली आहे. नारळापासून उत्पादित तेल, दूध, चिप्स, पावडर शिवाय अन्य विविध वस्तूंची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे परराज्यांतून नारळाची आवक कमी होत असल्याने स्थानिक भागात नारळाचे भाव वधारले आहेत.

उत्पादनात घट

बदलत्या हवामानासह कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे नारळ उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय माकडे नारळाचे नुकसान करीत असल्याने उत्पादकता घटली आहे.

उच्चत्तम दर

२० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ सध्या ४० ते ५० रुपयांना विकण्यात येत आहे. तसेच सुके खोबरे ४०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. नारळाबरोबर सुक्या खोबऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २०० रुपयांना मिळणाऱ्या खोबऱ्याच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.

हेही वाचा : उत्पादनशून्य जनावरांपासून यशस्वी उदरनिर्वाह; बीडच्या उमा ताईंची गोसेवेतील प्रेरणादायी वाटचाल

Web Title : नारियल और सूखे नारियल की कीमतों में उछाल, पिछले साल की दर से दोगुना

Web Summary : नारियल और सूखे नारियल की कीमतों में भारी वृद्धि हुई है, जो पिछले साल से दोगुनी हो गई है। मांग अधिक होने और अन्य राज्यों से आपूर्ति कम होने के कारण ऐसा हुआ है। रत्नागिरी में स्थानीय उत्पादन अपर्याप्त है, जिससे तमिलनाडु, केरल और कर्नाटक पर निर्भरता बढ़ गई है। प्रसंस्करण उद्योगों और जलवायु परिवर्तन का उत्पादन पर प्रभाव पड़ रहा है।

Web Title : Coconut and Dry Coconut Prices Surge, Doubling Last Year's Rate

Web Summary : Coconut and dry coconut prices have increased significantly, doubling since last year due to high demand and reduced supply from other states. Local production in Ratnagiri is insufficient, leading to reliance on Tamil Nadu, Kerala, and Karnataka. Processing industries and climate change impact production.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.