Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Harbhara Market : हरभरा उत्पादक अडचणीत; बाजारात दर घसरले, प्रति क्विंटल मोठा तोटा

Harbhara Market : हरभरा उत्पादक अडचणीत; बाजारात दर घसरले, प्रति क्विंटल मोठा तोटा

latest news Harbhara Market: Harbhara producers in trouble; Market prices fall, big loss per quintal | Harbhara Market : हरभरा उत्पादक अडचणीत; बाजारात दर घसरले, प्रति क्विंटल मोठा तोटा

Harbhara Market : हरभरा उत्पादक अडचणीत; बाजारात दर घसरले, प्रति क्विंटल मोठा तोटा

Harbhara Market : हरभरा उत्पादकांसाठी दुहेरी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय खरेदी बंद झाल्याने बाजारात दर तब्बल ६०० ते ८०० रुपयांनी घसरले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. हमीभाव असतानाही कमी दरात विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वाचा सविस्तर…(Harbhara Market)

Harbhara Market : हरभरा उत्पादकांसाठी दुहेरी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय खरेदी बंद झाल्याने बाजारात दर तब्बल ६०० ते ८०० रुपयांनी घसरले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. हमीभाव असतानाही कमी दरात विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वाचा सविस्तर…(Harbhara Market)

Harbhara Market : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.(Harbhara Market) 

शासकीय खरेदी प्रक्रिया अचानक थांबल्याने हमीभावाची अपेक्षा धुळीस मिळाली असून, शेतकऱ्यांना खासगी बाजारात कमी दरात माल विकण्याची वेळ आली आहे. परिणामी, प्रति क्विंटल ६०० ते ८०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.(Harbhara Market)

हमीभाव आणि बाजारभावात मोठी तफावत

शासनाने हरभऱ्यासाठी ५,८७५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असताना, सध्या खासगी बाजारात केवळ ४,५०० ते ५,३०० रुपये दर मिळत आहे. या मोठ्या तफावतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

शासकीय खरेदी बंद; खासगी बाजाराचा आधार

२४ एप्रिलपासून राज्यात हरभरा खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. कोटा पूर्ण झाला या कारणावरून ऑनलाइन पोर्टल बंद करण्यात आले.

मात्र, प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांनी आधीच नोंदणी करूनही त्यांचा माल अजून खरेदीसाठी प्रलंबित आहे. पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात विक्री करावी लागत आहे.

वाढता आर्थिक फटका

हरभऱ्याच्या उत्पादनासाठी बियाणे, खते, कीडनाशके, मजुरी यावर आधीच मोठा खर्च झाला आहे. 

आता कमी दर मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढला

उत्पन्न घटले

आर्थिक अडचणी वाढल्या

३०–४०% शेतकरी अजूनही प्रतीक्षेत

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी सुमारे ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचा माल अजून खरेदी झालेला नाही.

अनेकांनी हमीभावाच्या आशेने माल साठवून ठेवला होता

पण खरेदी बंद झाल्याने तोच माल आता अडचणीचे कारण ठरत आहे

धोरणावर प्रश्नचिन्ह

खरेदी प्रक्रिया अचानक बंद केल्यामुळे

शासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित

नोंदणीकृत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही

पारदर्शकतेबाबत शंका निर्माण

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:

प्रलंबित खरेदी तात्काळ सुरू करावी

सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करावा

बंद केलेले ऑनलाइन पोर्टल पुन्हा सुरू करावे

खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखावी

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला असताना, दुसरीकडे हमीभाव न मिळाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत, तर याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होऊ शकतो.

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market Update : शरबती गहू चमकला; 'या' बाजारात दराने घेतली झेप

अधिक वाचा : Aaple Sarkar Kendra : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'आपले सरकार' केंद्रांवर पारदर्शकता; नवा नियम लागू

Web Title : चना उत्पादक नुकसान में; बाजार में कीमतें गिरीं

Web Summary : चना उत्पादक किसान परेशान हैं क्योंकि सरकारी खरीद रुक गई और कीमतें समर्थन स्तर से नीचे गिर गईं। किसानों को प्रति क्विंटल भारी नुकसान हो रहा है, निजी बाजार सरकार द्वारा वादा की गई कीमत से बहुत कम दरें पेश कर रहे हैं। कई पंजीकृत किसान अभी भी खरीद का इंतजार कर रहे हैं।

Web Title : Chickpea Farmers Face Losses as Market Prices Plummet

Web Summary : Chickpea farmers are struggling as government procurement halts and prices fall below support levels. Farmers face significant losses per quintal, with private markets offering much lower rates than the government's promised price. Many registered farmers are still waiting for procurement.