e-NAM Scheme : शेतीमाल (Shetmal) विक्रीत क्रांती घडवणारी 'ई-नाम' योजना (e-NAM Scheme) आता उमरग्यात पोहोचली आहे. पारंपरिक बाजारपेठेच्या मर्यादा ओलांडून शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांशी थेट व्यवहार करता येणार आहे, त्यामुळे दरात स्पर्धा वाढून फायदा थेट शेतकऱ्यांच्या हाती जाणार आहे. (e-NAM Scheme)
शेतकऱ्यांना शेतीमालास (Shetmal) योग्य बाजारभाव मिळावा, व्यवहार पारदर्शक व्हावेत आणि राष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेचा उमरगा बाजार समितीमध्ये प्रभावी अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे.(e-NAM Scheme)
या पार्श्वभूमीवर उमरगा बाजार समितीच्या सभागृहात केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने नियुक्त केलेले मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांच्या उपस्थितीत ई-नामविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. शेतकरी, व्यापारी, परवानाधारक आडते व समितीचे अधिकारी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणात सहभागी झाले. (e-NAM Scheme)
ई-नाम म्हणजे काय?
ई-नाम (e-NAM) ही भारत सरकारची योजना असून तिचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी देशभरातील बाजारात समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. यामधून ऑनलाईन बोली, शेतीमालाचे ग्रेडिंग, योग्य वजन व बिल, तसेच आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यांचा समावेश होतो.
ई-नाम योजनेचे फायदे
* योग्य भाव : शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल.
* स्पर्धा : राज्यातील इतर बाजार समित्यांमधील खरेदीदार आणि व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य झाल्यामुळे स्पर्धा वाढेल, ज्यामुळे चांगला दर मिळू शकेल.
* पारदर्शकता : व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल.
* राष्ट्रीय बाजारपेठ : भविष्यात गावातील शेतमालाला राष्ट्रीय स्तरावरही बाजारपेठ उपलब्ध होईल.
* आर्थिक सुरक्षितता : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमांबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होईल.
नोंदणी कशी कराल?
ऑनलाइन : गुगल प्ले स्टोअरवरून e-NAM App डाउनलोड करा.
ऑफलाइन : स्थानिक बाजार समितीकडे थेट जाऊन नोंदणी करता येईल.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक (झेरॉक्स)
मोबाईल नंबर
उमरग्यातील प्रगती
२६ व्यापाऱ्यांचा ई-नाममध्ये समावेश झाला असून १ हजार १३२ शेतकऱ्यांची आतापर्यंत यशस्वी नोंदणी करण्यात आली आहे.
या वेळी सभापती बसवराज कस्तुरे, उपसभापती विजयकुमार माने, संचालक प्रल्हाद काळे, सुभाष गायकवाड, सचिव सिद्धप्पा घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी, व्यापारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतीमालास योग्य भाव, शेतीमालाचे वर्गीकरण (ग्रेडिंग) योग्य हाताने व मालाचे योग्य वजन तसेच विक्री झालेल्या मालाची राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदारांना व व्यापाऱ्यांना देखील बोली लावणे या योजनेअंतर्गत शक्य होणार आहे. - रंगनाथ कटरे, मार्गदर्शक, कृषी मंत्रालय
केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेचा शेतकरी व व्यापारी बांधवांना फायदा होणार आहे. यासाठी बाजार समितीच्या एकूण २६ व्यापाऱ्यांना ई-नाम योजनेमध्ये समाविष्ट केले असून, ई-नाममध्ये एकूण १ हजार १३२ शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. - सिद्धप्पा घोडके, सचिव