राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.
या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
यासोबतच राज्य शासनामार्फत हरभरा खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे. १ मार्च २०२६ पासून शेतकरी नोंदणी आणि ५,८७५ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने हरभर खरेदी सुरू करण्यात येत आहे, अशी माहितीही रावल यांनी विधानसभेत दिली.
