योगेश गुंडकेडगाव : ३० डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने तारखा असूनही लग्नकार्ये झाली नाहीत. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या तारखा असल्याने इकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व इतर धान्यांची आवक वाढली आहे.
अहिल्यानगर बाजार समितीच्या भुसार विभागात दिवसाला सरासरी दीड हजार क्विंटल आवक होत आहे. मुला-मुलींच्या लग्नकार्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, तूर राखून ठेवले होते. मात्र, दर वाढला नाही.
मुला-मुलींचे लग्न तोंडावर आल्याने राखीव ठेवलेले सोयाबीन व इतर धान्य विक्रीला काढले जात आहे. त्यामुळेच बाजारात धान्याची आवक असल्याचे दिसत आहे.
२३ जानेवारीला अहिल्यानगरच्या बाजार समितीत १२६५ क्विंटल आवक होती. मागील महिन्यात एवढी मोठी आवक नव्हती; परंतु आता लग्नसराई येत असल्याने खरेदीला पैसा लागतो म्हणून सोयाबीन व इतर धान्य बेभावात विकावे लागत आहे.
अशी आहे शेतमालाची आवक व दर
शेतमाल | किमान दर | कमाल दर | आवक |
तूर | ६००० | ७१०० | ७१५ |
हरभरा | ५६०० | ६००० | ५३ |
मूग | ६४०० | ७१०० | १० |
उडीद | ५५०० | ६५०० | ८१ |
गहू | २५०० | ३३०० | ४८ |
सोयाबीन | ३५५० | ४१०० | ७१ |
तुरीची ७०० क्विंटल आवकसध्या बाजारात तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. अहिल्यानगर बाजार समितीत तुरीची ७०० ते ८०० क्विंटल आवक सुरू आहे. याला ६ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर आहे. तुरीचीही आवक बाजारात लग्नसराईमुळेच आहे.
अधिक वाचा: Tur Bajar Bhav : अक्कलकोट बाजार समितीत ३८ हजार क्विंटल तुरीची आवक; मिळतोय सर्वाधिक दर