Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > सव्वातीन लाख खर्च अन् हाती आले ७५ हजार; पपई उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत

सव्वातीन लाख खर्च अन् हाती आले ७५ हजार; पपई उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत

Three and a half lakhs spent and 75 thousand received; Papaya producing farmers in trouble this year | सव्वातीन लाख खर्च अन् हाती आले ७५ हजार; पपई उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत

सव्वातीन लाख खर्च अन् हाती आले ७५ हजार; पपई उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत

अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बाजारातील कमी भाव याचा फटका यंदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यामुळे पपईचा मळा अक्षरशः नुकसानीच्या गळ्यात अडकला आहे.

अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बाजारातील कमी भाव याचा फटका यंदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यामुळे पपईचा मळा अक्षरशः नुकसानीच्या गळ्यात अडकला आहे.

अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बाजारातील कमी भाव याचा फटका यंदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यामुळे पपईचा मळा अक्षरशः नुकसानीच्या गळ्यात अडकला आहे. 

जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील संजय यांनी सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा खर्च करून उभा केलेल्या पिकातून आतापर्यंत केवळ ७५ हजार रुपयांचेच उत्पन्न हाती आले असून, उरलेल्या मालातून तरी जेमतेम खर्च निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे.

टोणगाव शिवारात शेतकरी संजय बडजावत यांनी सुमारे २ एकर क्षेत्रात एकूण १,६०० पपईच्या झाडांची लागवड केली आहे. ही लागवड १४ मार्च २०२५ रोजी करण्यात आली होती. पपई पिकासाठी खते, रासायनिक औषधे, फवारण्या यावर खर्च करण्यात आला होता. पपई फळांचे संरक्षण व्हावे, यासाठी पुरेशी व्यवस्थाही करण्यात आली होती.

अतिवृष्टी अन् पावसाने केली वाताहात

सुरुवातीला पपईचा मळा चांगला बहरलेला दिसत होता. मात्र, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले. याचा परिणाम म्हणून सुमारे २५० पपईच्या झाडांची मुळे सडून झाडे कोलमडली आणि मोठे नुकसान झाले. पहिला व दुसरा तोडा काढण्यात आला. मात्र या पपई मालाला सुरुवातीला ७ ते १० रुपये इतकाच भाव मिळाला.

मजुरी व वाहतूक खर्च वजा जाता अत्यल्प शिल्लक

पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याने अतिरिक्त खर्च करूनही कसाबसा मळा उभा ठेवला. आतापर्यंत या पिकावर सव्वातीन लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. प्रत्यक्षात फक्त ७५ हजार रुपयांचेच उत्पन्न हाती आले आहे. त्यातूनही मजुरी व वाहतूक खर्चवजा गेल्याने शिल्लक अत्यल्प राहिली आहे.

टोणगाव शिवारात १,६०० पपईच्या झाडांची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून सुमारे २५० झाडे नष्ट झाली. खते, औषधे, फवारण्या करून मोठ्या खर्चाने मळा वाचवला. आतापर्यंत फक्त ७५ हजार रुपयांचा माल निघाला आहे. भावही अत्यंत कमी मिळत आहे. उरलेल्या पिकातून तरी खर्च निघेल, एवढीच आशा आहे. - संजय बडजावत, टोणगाव, ता. भडगाव जि. जळगाव.

माल जास्त असूनही भाव नसल्याने अडचण

सध्या झाडांवर मोठ्या प्रमाणात पपईचा माल आहे. मात्र बाजारातील कमी भाव आणि उत्पादनात झालेली घट यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

Web Title : कम दाम और ज़्यादा लागत से पपीता किसान परेशान।

Web Summary : जलगॉंव, महाराष्ट्र में भारी बारिश और बाज़ार में कम दामों के कारण पपीता किसानों को भारी नुकसान हुआ है। संजय नामक एक किसान ने ₹3.25 लाख का निवेश किया, लेकिन फसल खराब होने और दरें घटने से केवल ₹75,000 ही कमाए। कई पपीते के पौधे सड़ गए, जिससे किसान लागत वसूलने के लिए संघर्ष कर रहे हैं।

Web Title : Papaya farmers in trouble due to low prices, high costs.

Web Summary : Heavy rains and low market prices have severely impacted papaya farmers in Jalgaon, Maharashtra. One farmer, Sanjay, invested ₹3.25 lakh but earned only ₹75,000 due to crop damage and reduced rates. Many papaya plants rotted, leaving farmers struggling to recover costs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.